शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

बांगला हत्याकांडामागे स्थानिक दहशतवादी!

By admin | Updated: July 4, 2016 06:01 IST

हत्याकांडाबद्दल बांगलादेशने रविवारी देशातच वाढलेले इस्लामी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना आयएसआयला जबाबदार धरले.

ढाका : देशाला मुळापासून हादरवून सोडलेल्या हत्याकांडाबद्दल बांगलादेशने रविवारी देशातच वाढलेले इस्लामी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना आयएसआयला जबाबदार धरले. या भयंकर हल्ल्यात ओलिस धरण्यात आलेल्या २० विदेशी नागरिकांची गळे चिरून हत्या झाली. या हल्ल्यात इस्लामिक स्टेटची भूमिका नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. या हत्याकांडाबद्दल देशात दोन दिवस दुखवटा पाळला जात आहे. गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘ बांगलादेशात इसिस किंवा अल कायदाचे अस्तित्व नाही हे मला स्पष्ट करायचे आहे. विदेशी नागरिकांना ज्यांनी ओलिस धरले होते ते सगळे देशातच वाढलेले दहशतवादी होते, इसिस किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे नव्हते.’ ओलिस धरणारे वत्यांचे पूर्वज कोण आहेत याची कल्पना आहे. ते सगळे बांगलादेशात वाढलेले होते व ते जमातुल मुजाहिदीन बांगलादेशसारख्या (जेएमबी) संघटनांशी संबंधित आहेत. ओलिस धरलेले व मृतांमध्ये बहुसंख्य विदेशी नागरिक व दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे हत्याकांड आम्ही घडविल्याचा दावा इस्लामिक स्टेटने (इसिस) केला होता. होले आर्टिसन बेकरीत घुसून दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री सुरू केलेले हे ओलिस धरून केलेले हत्याकांड सत्र ११ तासांनी शनिवारी संपले. लष्कराने बेकरीवर कारवाई केली त्यात सहा हल्लेखोर ठार झाले, तर एकाला जिवंत पकडण्यात आले.हल्लेखोरांनी ओलिसांची ज्या मोठ्या कोयत्याने हत्या केली ती बघता त्यात बंदी घालण्यात आलेल्या स्थानिक जमात- उल- मुजाहिदीन या दहशतवादी गटाचा हात असल्याचे सूचित होते, असे पंतप्रधान शेख हसीना यांचे राजकीय सल्लागार हुसेन तौफिक इमाम यांनी म्हटले. आयएसआय आणि जमातमधील संबंध सर्वांना माहीत आहेत. त्यांना सध्याचे सरकार काढून टाकायचे आहे, असे इमाम दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याकडे महत्त्वाची माहिती आहे, असेही ते म्हणाले. ओलिस धरून ठार मारलेल्यांमध्ये १९ वर्षांची भारतीय तरुणी तारिशी जैन, नऊ इटालियन, सात जपानी, एक बांगलादेशी वंशाचा अमेरिकन, दोन बांगलादेशींचा समावेश आहे. बहुतेक मृतांचा गळा चिरल्याचे आढळले आहे.>तारिशीच्या अंगावर जखमाअमेरिकेतून उन्हाळी सुट्यांसाठी येथे आलेली तारिशी जैन (१९) ही होले आर्टिझन बेकरीमध्ये शुक्रवारी सायंकाळी तिच्या दोन मैत्रिणींसोबत गेली होती. ढाक्यातील पॉश गुलशन भागात असलेल्या तिच्या घराजवळ ही बेकरी होती व तेथील पदार्थांची तिला मोठी आवड होती. तिचे वडील संजीव जैन यांचा ढाक्यामध्ये १५-२० वर्षांपासून कपड्यांचा व्यवसाय आहे. बेकरीत ओलिस प्रकरण सुरू झाल्यानंतर पहिला बळी पडली ती तारिशी. तिच्या मैत्रिणी अनबिता कबीर आणि फराज हुसेन यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार तारिशी जैनसह अन्य ओलिसांचा त्यांना ठार मारण्यापूर्वी शारीरिक छळ झाल्याचे त्यांच्या शरीरावरील जखमांतून स्पष्टपणे दिसते.तारिशी जैनचा मृतदेह फिरोजाबादेत आणणारनवी दिल्ली : तारिशी जैन हिचा मृतदेह तिच्या मूळ गावी फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) येथे आणण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या तिच्या नातेवाईकांशी समन्वय राखून आहेत. मी तिचे वडील संजीव जैन यांच्याशी फोनवर बोलले व तिच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. या अतीव दु:खद प्रसंगात देश त्यांच्यासोबत आहे, असे स्वराज म्हणाल्या. आम्ही तिच्या कुटुंबियांसाठी व्हिसाची सोय करीत आहोत. तारिशीचा मृतदेह नवी दिल्लीत आणला जाऊन तो फिरोजाबादेत नेला जाईल, असेही त्या म्हणाल्या.