शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

भारतीयांचे आयुर्मान वाढले

By admin | Updated: December 19, 2014 04:20 IST

भारताने १९९० पासून बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यात मोठी झेप घेतली आहे. भारतातील बालकांसह प्रौढ मंडळी आता दोन दशकांपूर्वीपेक्षा अधिक आणि आरोग्यदायी जीवन जगत आहेत,

वॉशिंग्टन : भारताने १९९० पासून बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यात मोठी झेप घेतली आहे. भारतातील बालकांसह प्रौढ मंडळी आता दोन दशकांपूर्वीपेक्षा अधिक आणि आरोग्यदायी जीवन जगत आहेत, असे एका नव्या संशोधनामध्ये आढळून आले आहे. संसर्गजन्य आजारामुळे आणि हृदयाशी संबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगभरातील लोकांचे आयुष्य वीस वर्षांपूर्वीपेक्षा वाढल्याचे संशोधनात आढळून आले. भारताच्या लोकसंख्येचा आकार व वाढीचा दर पाहता हा देश लवकरच सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. घटलेल्या मृत्युदराचा हा परिणाम असेल, असे संशोधकांनी म्हटले. (वृत्तसंस्था)२०१३ मध्ये जगातील एकूण मृत्यूपैकी भारतात १९ टक्के अथवा १२ लाख मृत्यू झाले. १९९० नंतर भारताने बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यामध्ये मोठी आघाडी घेतली. मृत्युदरातील दरवर्षीची सरासरी घट बालकांसाठी ३.७ टक्के, तर प्रौढांसाठी १.३ टक्के एवढी आहे. १९९० ते २०१३ दरम्यान जन्मावेळी आयुर्मान अपेक्षा महिलांसाठी ५७.३ वर्षांहून ६४.२ वर्षे, तर पुरुषांसाठी ५८.२ वर्षांहून ६८.५ वर्षे एवढी झाली. भारतातील बालके आणि प्रौढ आता अधिक जीवन जगत आहेत ही बाब कमालीची उत्साहवर्धक आहे, असे पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे डॉ. जिमोन पन्नीयाम्माकल म्हणाले. हे संशोधन द लान्सेटमध्ये प्रकाशित झाले असून डॉ. जिमोन त्याचे सहलेखक आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॉल्युएशनच्या नेतृत्वाखाली ७०० संशोधकांच्या एका चमूने हे संशोधन केले. या चमूत डॉ. पन्नीयाम्माकल यांचा समावेश होता.