शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

भारतीयांचे आयुर्मान वाढले

By admin | Updated: December 19, 2014 04:20 IST

भारताने १९९० पासून बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यात मोठी झेप घेतली आहे. भारतातील बालकांसह प्रौढ मंडळी आता दोन दशकांपूर्वीपेक्षा अधिक आणि आरोग्यदायी जीवन जगत आहेत,

वॉशिंग्टन : भारताने १९९० पासून बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यात मोठी झेप घेतली आहे. भारतातील बालकांसह प्रौढ मंडळी आता दोन दशकांपूर्वीपेक्षा अधिक आणि आरोग्यदायी जीवन जगत आहेत, असे एका नव्या संशोधनामध्ये आढळून आले आहे. संसर्गजन्य आजारामुळे आणि हृदयाशी संबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगभरातील लोकांचे आयुष्य वीस वर्षांपूर्वीपेक्षा वाढल्याचे संशोधनात आढळून आले. भारताच्या लोकसंख्येचा आकार व वाढीचा दर पाहता हा देश लवकरच सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. घटलेल्या मृत्युदराचा हा परिणाम असेल, असे संशोधकांनी म्हटले. (वृत्तसंस्था)२०१३ मध्ये जगातील एकूण मृत्यूपैकी भारतात १९ टक्के अथवा १२ लाख मृत्यू झाले. १९९० नंतर भारताने बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यामध्ये मोठी आघाडी घेतली. मृत्युदरातील दरवर्षीची सरासरी घट बालकांसाठी ३.७ टक्के, तर प्रौढांसाठी १.३ टक्के एवढी आहे. १९९० ते २०१३ दरम्यान जन्मावेळी आयुर्मान अपेक्षा महिलांसाठी ५७.३ वर्षांहून ६४.२ वर्षे, तर पुरुषांसाठी ५८.२ वर्षांहून ६८.५ वर्षे एवढी झाली. भारतातील बालके आणि प्रौढ आता अधिक जीवन जगत आहेत ही बाब कमालीची उत्साहवर्धक आहे, असे पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे डॉ. जिमोन पन्नीयाम्माकल म्हणाले. हे संशोधन द लान्सेटमध्ये प्रकाशित झाले असून डॉ. जिमोन त्याचे सहलेखक आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॉल्युएशनच्या नेतृत्वाखाली ७०० संशोधकांच्या एका चमूने हे संशोधन केले. या चमूत डॉ. पन्नीयाम्माकल यांचा समावेश होता.