शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 21:31 IST

मागील १०-१२ वर्षात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातूनच अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे असं तटकरे यांनी म्हटलं.

लंडन - महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात गुंतवणूक येत आहे. राज्यातील जनतेकडून गुंतवणुकीला पोषक वातावरण असल्याने अर्थव्यवस्था २-३ पटीने पुढे जात आहे. त्यात 'लाडकी बहीण' योजनेत महिलांना मिळालेला पैसा बाजारात येत आहे. त्यातून अर्थव्यवस्थेला चालनाच मिळत आहे, असं मत माजी अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी मांडले. लंडन येथील 'लोकमत ग्लोबल इकॉनोमिक कन्व्हेन्शन' मध्ये 'महाराष्ट्र इकोनॉमी पॉवर हाऊस ऑफ इंडिया' या चर्चासत्रात ते बोलत होते. 

लोकमत समूहाचे 'एडिटर इन चीफ' राजेंद्र दर्डा यांनी 'लाडकी बहीण' योजनेबाबत उपस्थित पॅनेलिस्टला प्रश्न विचारला. महाराष्ट्रावर ७ लाख कोटींचे कर्ज असताना 'लाडकी बहीण'सारख्या योजनांवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होत आहेत. त्यातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सरकार पुढे कसं नेणार असं त्यांनी विचारले. यावर सुनील तटकरे म्हणाले की, महाराष्ट्रावर सात लाख कोटींचे कर्ज झाले असले तरी देशाच्या जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्राची कर्जाची मर्यादा खूप कमी आहे. मागील १०-१२ वर्षात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातूनच अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. गेल्या १२-१३ महिन्यात लाडकी बहीण योजनेतून किमान ५० हजार कोटी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मिळाले आहेत. हे पैसेही बाजारात आले. ते साधारण तिप्पट धरले, तर दीड लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. याचा अर्थ लावला तर लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना खरे उत्तर मिळेल. महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात ज्याप्रकारे गुंतवणूक येत आहे आणि गुंतवणुकीला पोषक वातावरण राहते तेव्हा अर्थव्यवस्था २-३ पटीने पुढे जाते. राज्यात आर्थिक गुंतवणुकीला राज्यातील जनतेने पूरक वातावरण ठेवले आहे असं त्यांनी सांगितले. 

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या विषयाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला.  ते म्हणाले, कल्याणकारी राज्याचं धोरण समजणं आवश्यक आहे. महाराष्ट्र एक कल्याणकारी राज्य आहे. कल्याणकारी राज्यात केवळ आकडे पाहून चालत नाही, तर सामाजिक निर्देशांकही महत्त्वाचा असतो. लाडकी बहीणसारखी योजना ही सामाजिक दृष्टीकोनातून आवश्यक आहे. त्यामुळे अशा योजना आपण आणल्या नाहीत आणि केवळ आकडेवारी पाहत राहिलो तर आपली जी मूळ जबाबदारी आहे त्यावर आपण काम करू शकत नाही. कुठल्याही अर्थव्यवस्थेत राजकोषीय असमतोल कमी करायचा असेल तर आपल्याला महसूल जमा करण्यासोबतच भांडवल उभारणं गरजेचे आहे. कृषी उत्पादन हे भांडवल उभं करण्याची संधी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. कृषीसोबतच पर्यटनाला चालना दिल्यास भांडवली महसूल वाढेल. महाराष्ट्राला हे माहिती झाले आहे. त्यामुळे सरकार कृषी, पर्यटन या सर्व क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहेत. जलयुक्त शिवार ही महत्त्वाची योजना आहे. त्यातून शेतकऱ्यांना संधी मिळत आहे. कृषी अर्थव्यवस्थेला त्यातून चालना मिळत आहे. त्यातून भांडवल उभं राहणार आहे. त्यामुळे खर्च करण्यात काही अडचण नाही. हा पैसा जनतेच्या भल्यासाठी खर्च होतोय. निधीतील कमतरता दूर करण्यासाठी राज्याकडे धोरणे आहेत. राज्य योग्य प्रकारे त्यावर काम करत आहे, अशी मुद्देसुद मांडणी राहुल नार्वेकर यांनी केली.  

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सध्या नदी जोड प्रकल्प मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू आहे. त्यातून येणाऱ्या काळात अनेक जमिनी सिंचनाखाली येतील. बऱ्याच भागातील दुष्काळ संपुष्टात येतील. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी  आणि अन्य सिंचन प्रकल्पातील पैसे वाचतील. त्यातून अर्थव्यवस्था वाढेल. त्यामुळे सरकारला निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाLokmat Global Economic Convention London 2025लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन, लंडन २०२५sunil tatkareसुनील तटकरेRahul Narvekarराहुल नार्वेकरRajendra Dardaराजेंद्र दर्डा