शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

"चीनला काहीही बडबडू दे, आम्ही स्पष्टच सांगतोय अरूणाचल प्रदेश भारताचाच"; पराराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 15:11 IST

भारताचे पंतप्रधान मोदी अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेल्यानंतर चीनी नेत्यांनी विरोध केला होता

Arunachal Pradesh, India vs China: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे बनले आहेत. चीन सातत्याने शेजारील देशांवर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही चिनी घुसखोरीचा प्रयत्न होताना सतत दिसतो. पण भारत सरकार आणि भारतीय लष्कर चीनचा प्रयत्न प्रत्येक वेळी हाणून पाडते. नुकताच भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच हिस्सा आहे आणि तो कायम भारतातच राहिल, असे भारताने ठणकावून सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की चीनने कितीही वेळा आपल्या बेताल दाव्यांची पुनरावृत्ती केली तरी, अरुणाचल प्रदेश आमचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील ही आमची भूमिका बदलणार नाही.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सुरू ठेवल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सोमवारी चीनच्या दाव्याचा पुनरुच्चार केल्यानंतर काही दिवसांतच भारताकडून या दाव्याला प्रत्युत्तर देण्यात आले. चीनला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर आम्ही वारंवार सांगितले आहे की, चीन आपले बिनबुडाचे दावे हवे तितक्या वेळा करू शकतो, आमचा मुद्दा बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि राहील. याआधीही भारताने एका निवेदनात म्हटले होते की, भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनचा विरोध मूर्खपणाचा आणि निराधार आहे.

चीनने काय केला दावा?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे उत्तर चीनच्या दाव्यानंतर दिले. चीनने अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे सांगितले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल झांग झियाओगांग यांनी १५ मार्च रोजी एक निवेदन जारी करून भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्याला विरोध केला होता. पंतप्रधान मोदींनी नुकतेच अरुणाचल प्रदेशमधील सेला बोगद्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर चीनचे हे वक्तव्य समोर आले होते. ज्यामध्ये चीनने म्हटले की, 'जिजांग (तिबेटचे चिनी नाव) हा चीनचा भाग आहे आणि चीन भारतीय नेत्यांचा तथाकथित अरुणाचल प्रदेश कधीही स्वीकारणार नाही आणि त्याचा कडक विरोध करेल.' मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला जोरदार प्रत्युत्तर देत चीनचे असे दावे फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत