शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
3
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
4
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
5
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
6
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
7
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
8
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
9
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
10
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
11
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
12
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
13
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
14
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
15
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
16
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
17
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
18
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
19
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
20
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?

‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 06:30 IST

जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे.

लंडन : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताच्या ताब्यात आल्यानंतर काश्मीरची समस्या पूर्णपणे सुटेल, असे उद्गार परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काढले. ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्र्यांनी लंडन येथील चॅथम हाउसच्या कार्यक्रमात सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या देशाच्या परराष्ट्र धोरणात बदल करत असून, त्यामुळे भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जग एका नवीन व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.

जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे. काश्मीरमधील विकास, तेथील आर्थिक घडी नीट बसविणे हा दुसरा टप्पा व विधानसभा निवडणुका घेणे हा तिसरा टप्पा होता. त्या गोष्टी आता प्रत्यक्षात आल्या आहेत. 

पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की, काश्मीरची समस्या संपणार आहे. प्राचीन इतिहास असलेल्या भारत व चीन देशांतील संबंधांत काही चढउतार आले. मात्र आता स्थिती सुरळीत होत आहे. सीमा रक्षणास भारताने प्राधान्य दिले आहे, असेही ते म्हणाले.

खलिस्तानवाद्यांचा घेरावाचा प्रयत्न

जयशंकर यांच्या गाडीला खलिस्तानवाद्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला व भारताविरोधात घोषणा दिल्या. बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. या धक्कादायक घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या घटनेचा ब्रिटननेही निषेध केला. मात्र, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे पोलिसांनी सांगितले.

काश्मीरचा ताबा भारताने सोडावा : पाकिस्तान

पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, भारताने निराधार दावे करू नयेत. त्याऐवजी ७७ वर्षांपासून असलेला जम्मू-काश्मीरचा ताबा भारताने सोडावा.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPOK - pak occupied kashmirपीओकेLondonलंडन