शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 06:30 IST

जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे.

लंडन : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताच्या ताब्यात आल्यानंतर काश्मीरची समस्या पूर्णपणे सुटेल, असे उद्गार परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काढले. ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्र्यांनी लंडन येथील चॅथम हाउसच्या कार्यक्रमात सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या देशाच्या परराष्ट्र धोरणात बदल करत असून, त्यामुळे भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जग एका नवीन व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.

जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे. काश्मीरमधील विकास, तेथील आर्थिक घडी नीट बसविणे हा दुसरा टप्पा व विधानसभा निवडणुका घेणे हा तिसरा टप्पा होता. त्या गोष्टी आता प्रत्यक्षात आल्या आहेत. 

पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की, काश्मीरची समस्या संपणार आहे. प्राचीन इतिहास असलेल्या भारत व चीन देशांतील संबंधांत काही चढउतार आले. मात्र आता स्थिती सुरळीत होत आहे. सीमा रक्षणास भारताने प्राधान्य दिले आहे, असेही ते म्हणाले.

खलिस्तानवाद्यांचा घेरावाचा प्रयत्न

जयशंकर यांच्या गाडीला खलिस्तानवाद्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला व भारताविरोधात घोषणा दिल्या. बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. या धक्कादायक घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या घटनेचा ब्रिटननेही निषेध केला. मात्र, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे पोलिसांनी सांगितले.

काश्मीरचा ताबा भारताने सोडावा : पाकिस्तान

पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, भारताने निराधार दावे करू नयेत. त्याऐवजी ७७ वर्षांपासून असलेला जम्मू-काश्मीरचा ताबा भारताने सोडावा.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPOK - pak occupied kashmirपीओकेLondonलंडन