शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 09:52 IST

Kailash Mansarovar Yatra: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जी-२० शिखर संमेलनादरम्यान द्वीपक्षीय चर्चा केली.

नवी दिल्ली/रिओ दी जनेरिओ : भारत आणि चीनमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा पुन्हा बहाल करणे, सीमेपलिकडील नद्यांवरील माहिती एकमेकांना देणे इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता. 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जी-२० शिखर संमेलनादरम्यान द्वीपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंध सुधराविण्यावर दोघांनी सहमती दर्शविली. वर्चस्व स्थापन करण्याच्या एकांगी दृष्टीकोनाच्या विरोधात भारत आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

सैन्यमाघारी प्रक्रियेचा घेतला आढावा

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील डेमचोक, डेपसांग येथे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली होती. त्या प्रक्रियेचा जयशंकर व वांग यी यांनी आढावा घेतला.

पूर्व लडाखचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने तसेच दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्यासाठी भविष्यात काय पावले उचलायची, याविषयीही परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली. 

त्याबाबत एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, सीमाभागातून सैन्य मागे घेण्याच्या कारवाईच्या प्रगतीबाबत मी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. तसेच भविष्यात कोणती पावले उचलायची याविषयी देखील आमचे बोलणे झाले.  

टॅग्स :chinaचीनReligious Placesधार्मिक स्थळेprime ministerपंतप्रधानG20 Summitजी-२० शिखर परिषद