शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

43 दिवसानंतर बालकोटमध्ये पोहचले पत्रकार, प्रश्नांना उत्तर देताना पाक सैन्याची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 18:30 IST

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसानंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेली.

बालकोट - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसानंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेली. मात्र पत्रकारांसोबत यावेळी पाकिस्तान लष्कराचे सैन्यही त्यांच्यासोबत होते. ज्या वेळेला परदेशी पत्रकारांनी बालकोट परिसरातील स्थानिक लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पाकिस्तानी सैन्याकडून जाणूनबुजून घाई करत स्थानिक जनतेला पत्रकारांशी संवाद साधण्यात टाळत होते. त्यामुळे पाकिस्तानकडून नक्कीच काहीतरी लपविण्याचा प्रयत्न केला जातो असा संशय निर्माण होतोय. 

काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत असणाऱ्या बालकोट भागात घुसून दहशतवादी तळांना टार्गेट केलं होतं. मात्र पाकिस्तानकडून बालकोट भागात ज्याठिकाणी भारताने हल्ला केला तिथं दहशतवादी तळ नसून मदरसा चालविण्यात येत होती असा दावा केला होता. 

या घटनेनंतर पाकिस्तानकडून माध्यमांना दावा करण्यात आला होता की, आम्ही लवकरच पत्रकारांना ज्या भागात भारताने एअर स्ट्राईक केलं त्याठिकाणी नेण्यात येईल मात्र ते खोटं ठरलं. पाकिस्ताने 43 दिवसानंतर माध्यमांना त्या परिसरात घेऊन जात खोटं दाखविण्याचा प्रयत्न केला. आईएएनएसने बीबीसी वृत्ताचा हलावा देत सांगितले की, इस्लामाबादमधून एक हेलिकॉप्टरमधून आम्हाला घेऊन गेले त्यानंतर मनसेराजवळ हेलिकॉप्टर उतरविण्यात आलं. तेथून पुढे दीड तास अवघड असलेला डोंगराळ भागातील रस्त्यामधून आमचा प्रवास झाला असं तिथे गेलेल्या पत्रकाराने सांगितले. 

मिडीयाच्या प्रतिनिधींना तीन वेगवेगळ्या भागात नेण्यात आले. पाकिस्तानकडून त्यांना सांगितले की भारताच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात आमच्या येथील झाडांचे नुकसान झाले मात्र प्रत्यक्षात घटनास्थळावर काही खडडे आणि मुळासकट कोसळलेली झाडं दिसली. हा प्रदेश मानवी वस्तीपासून खूप दूर होता. माध्यमांनी पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना विचारलं की, पत्रकारांना या ठिकाणी आणण्यासाठी तुम्हाला एवढा विलंब का झाला? यावर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तणावग्रस्त परिस्थितीत येथे लोकांना आणणं अवघड होतं. आता योग्य वेळ आली म्हणून आपल्या सगळ्या पत्रकारांचा दौरा नियोजित करण्यात आला असं पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले. तसेच यावेळी मदरसाजवळ असणाऱ्या बोर्डवर मौलाना यूसुफ अजहरचं नावं बघितलं त्यावरही विचारलेल्या प्रश्नांवर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सरळ उत्तर दिलं नाही. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान