शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा परिषदेचा भारत कायमस्वरूपी सदस्य नाही, ही विसंगती नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 07:59 IST

फ्रान्स दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जगासमोर ठेवला प्रश्न, जागतिक संस्था आजच्या जगाचे प्रतिनिधित्व करतात का? ज्या भूमिकेसाठी त्यांची स्थापना झाली, त्या भूमिका पार पाडण्यासाठी त्या संस्था सक्षम आहेत का?

नवी दिल्ली : सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य नाही, ही सर्वात मोठी विसंगती नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला. भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधांना २५ वर्षे झाली. या निमित्ताने पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची ‘लेस इकोस’ या अग्रणी फ्रेंच दैनिकाचे निकोलस बर्रे आणि क्लेमेंच पेरुचे यांनी मुलाखत घेतली. त्यात पंतप्रधान मोदी यांनी विविध प्रश्नांवर सखोल उत्तरे दिली.  

आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये दक्षिणेची उपस्थिती वाढवण्यासाठी तुमची काय योजना आहे? या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की...‘जी-२०’ अध्यक्षपदाच्या काळात ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेंतर्गत ‘ग्लोबल साउथ’चा आवाज बनणे हे भारताच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. ‘जी-२०’च्या चर्चा आणि निर्णयांच्या केंद्रस्थानी ‘ग्लोबल साउथ’चे प्राधान्य आणि हित आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जी-२०’मध्ये आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मी ठेवला आहे. अर्थात, ‘ग्लोबल साउथ’ची बाजू मांडताना उत्तरेशी कोणतेही प्रतिकूल संबंध तयार व्हावे, अशी भारताची इच्छा नाही. 

जागतिक संस्था आजच्या जगाचे प्रतिनिधित्व करतात का? ज्या भूमिकेसाठी त्यांची स्थापना झाली, त्या भूमिका पार पाडण्यासाठी त्या संस्था सक्षम आहेत का? विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या विसंगतीचे प्रतीक म्हणता येईल. सुरक्षा परिषदेची सध्याची स्थिती याचे द्योतक आहे. या संस्थेच्या रचनेमध्ये आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या संपूर्ण खंडांकडे दुर्लक्ष केले जात असताना ही संस्था जगाचे प्रतिनिधित्व करते, असे कसे म्हणता येईल?, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

शांतता आणि स्थैर्य निर्माण करणे, हेच आमचे उद्दिष्ट भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, आर्थिक, मानव-केंद्रित विकास आणि शाश्वतताविषयक सहकार्य, अशा सर्वच क्षेत्रांना सामावून घेणारी व्यापक आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रासह आमची भागीदारी कोणत्याही देशाच्या विरोधात किंवा कोणत्याही देशाच्या बळावर नाही. या प्रदेशातील आमच्या आर्थिक आणि संरक्षणविषयक हितसंबंधांचे रक्षण करणे, प्रवास तथा व्यापारासाठी दिशादर्शन सुनिश्चित करणे आणि आंतरराष्ट्रीय कायदा कायम राखणे, हाच आमचा उद्देश आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य निर्माण करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.

२०४७ मध्ये आम्हाला भारताला विकसित राष्ट्र झालेले पाहायचे आहे. अशी अर्थव्यवस्था, जी तिच्या सर्व नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संधी यांच्याशी संबंधित सर्व गरजांची पूर्तता करेल. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी