शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

आयएसआयकडून अजूनही पोखरणच्या वाळूचा शोध

By admin | Updated: May 13, 2014 04:36 IST

भारताने यशस्वी अणुचाचणी केल्याला आता १६ वर्षे उलटली आहेत.ही चाचणी केल्यानंतर अण्वस्त्रे असणार्‍या देशांत भारत ६ व्या क्रमांकावर आला.

जैसलमेर : भारताने यशस्वी अणुचाचणी केल्याला आता १६ वर्षे उलटली आहेत. ही चाचणी केल्यानंतर अण्वस्त्रे असणार्‍या देशांत भारत ६ व्या क्रमांकावर आला. पोखरण येथे ११ मे १९९८ रोजी झालेल्या या चाचणीनंतर पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय स्फोट झालेल्या ठिकाणावरील वाळू व माती मिळविण्याचा प्रयत्न करीत असून, आजपर्यंत त्यांना या प्रयत्नात यश आलेले नाही; पण अजूनही या भागात आयएसआयची टेहळणी चालू असून, ही माती मिळविण्याचे प्रयत्न आताही जारी आहेत. पोखरणमधील फायरिंग रेंजच्या अखेरच्या टोकावर ही अणुचाचणी करण्यात आली होती. या ठिकाणावर आजही कडक सुरक्षा व्यवस्था असून, तेथे जाण्यासाठी चार सुरक्षा पहारे ओलांडावे लागतात. १९९८ साली झालेल्या या अणुचाचणीची आधी काहीही माहिती न मिळाल्याची अमेरिकेला आजही खंत वाटते, सीआयएचे प्रमुख जॉन टेनेट यांनी तसा उल्लेख केला होता. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएसआयने या ठिकाणावरील वाळू व माती मिळविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ही वाळू घेऊन भारताने अणुचाचणी कशी केली असावी याची माहिती मिळविणे हा आयएसआयच्या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे; परंतु सीमा सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा उद्देश अजून सफल होऊ शकलेला नाही. (वृत्तसंस्था)