शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

'संविधान पुन्हा लिहा, ३ दशकांच्या लुटीची चौकशी करा'; आंदोलन करणाऱ्या नेपाळच्या तरुणांच्या प्रमुख मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:12 IST

नेपाळमध्ये सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये दोन दिवस सुरु असलेल्या तरुणांच्या आंदोलनाने देशातील सत्ता उलथवून लावली. या हिंसक आंदोलनात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झालाय. आंदोलकर्त्यांनी थेट मंत्र्यांना आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य केल्याने आंदोलन चिघळले आहे. आंदोलकांनी माजी पंतप्रधानांच्या घरांनाही सोडले नाही. संसदेपासून ते मंत्रालयापर्यंत सर्व काही जाळून टाकण्यात आले. तरुणाईच्या आंदोलनाने  इतके भयानक वळण घेतले की पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपतींना घाईघाईने त्यांच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला. आता आंदोलन करणाऱ्यांच्या मागण्या समोर आल्या आहेत.

नेपाळमध्ये युवकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक आंदोलनाने देशाला गंभीर राजकीय संकटात ढकलले आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सोशल मीडिया बंदीविरोधातील या आंदोलनात आतापर्यंत २२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले आहेत. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर नेपाळी लष्कराने मध्यस्थीची भूमिका बजावत सरकारची सुत्रे हातात घेतली आहे. दुसरीकडे आंदोलकर्त्यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

जनरेशन झेड आंदोलकांनी अनेक राजकीय आणि सामाजिक मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये संविधानाचे पुनर्लेखन किंवा दुरुस्ती, प्रशासनात व्यापक सुधारणा आणि गेल्या तीन दशकांत राजकारण्यांनी लुटलेल्या संपत्तीची चौकशी यांचा समावेश आहे. आंदोलनादरम्यान आंदोलन करताना प्राण  गमावलेल्या सर्वांना अधिकृतपणे शहीदांचा दर्जा दिला जाईल आणि त्यांच्या कुटुंबियांना राज्य सन्मान, आदर आणि मदत दिली जाईल, बेरोजगारी रोखण्यासाठी, स्थलांतर रोखण्यासाठी आणि सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी योजना आखल्या जातील असं सांगितलं होतं.

हे आंदोलन कोणत्याही पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर संपूर्ण पिढीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे, असे आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे. शांतता आवश्यक आहे पण ती केवळ एका नवीन राजकीय व्यवस्थेच्या पायावरच शक्य आहे, असे आंदोलनकर्त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. राष्ट्रपती आणि नेपाळी सैन्य त्यांच्या प्रस्तावांची सकारात्मक अंमलबजावणी करतील अशी आशा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

सध्याची लोकसभा तात्काळ विसर्जित करा. त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे.

संविधानात सुधारणा किंवा पुनर्लेखन, नागरिक, तज्ञ आणि तरुणांचा सक्रिय सहभाग करा.

अंतरिम कालावधीनंतर नवीन निवडणुका घेणे. त्या मुक्त, निष्पक्ष आणि थेट सार्वजनिक सहभागावर आधारित असल्याची खात्री करणे.

थेट निवडून आलेल्या कार्यकारी नेतृत्वाची स्थापना.

गेल्या तीन दशकांत लुटलेल्या संपत्तीची चौकशी, ज्यामध्ये बेकायदेशीर मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण समाविष्ट आहे.

शिक्षण, आरोग्य, न्याय, सुरक्षा आणि दळणवळण या पाच मूलभूत संस्थांची संरचनात्मक सुधारणा आणि पुनर्रचना.

टॅग्स :Nepalनेपाळ