शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:58 IST

दोन आठवड्यांत ४० ते ५० अतिरेक्यांची घुसखोरी : ३०० ते ३५० अतिरेकी एलओसीजवळ दबा धरून बसले

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सुरक्षा दलाने असे प्रयत्न हाणून पाडले आहेत, अशी माहिती ले. जनरल केजेएस धील्लन यांनी दिली. तथापि, ३०० ते ३५० अतिरेकी काश्मिरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गुप्तचर एजन्सी आणि सुरक्षा दलाने म्हटले आहे, तर गत दोन आठवड्यांत ४० ते ५० अतिरेकी घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धिल्लन यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न झाला नाही, असा एकही दिवस गेला नाही. पाकिस्तानने उघडपणे जाहीर केलेले आहे की, काश्मिरींच्या मदतीसाठी आम्ही सर्वकाही करू. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी काश्मिरींना उघड समर्थन दिले आहे. मे आणि जूनमध्ये घुसखोरीत घट झाली होती. कारण, पाकिस्तानला अशी आशा होती की, मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर चर्चेचा मार्ग मोकळा होईल. नियंत्रण रेषेनजीकचे लाँच पॅडही जुलैअखेरीस रिकामे करण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. सध्या दररोज किमान १० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीदपाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करून जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर व गावांवर उखळी तोफगोळ्यांचा मारा केला. यात एक जवान शहीद झाला. पूंछ सेक्टरमध्ये शाहपूर-केरनी भागातील सीमेवर ही घटना घडली. पाकने अनेक ठिकाणी गोळीबारही केला. भारताने याला चोख प्रत्युत्तर दिले. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पूंछ व राजौरी जिल्ह्यांचा दौरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला आहे.पाक म्हणतो, आम्ही चर्चेस तयारपरराष्ट्रमंत्री कुरेशी म्हणाले, भारताने काही अटी मान्य कराव्यातइस्लामाबाद : काश्मीरमधील नेत्यांशी भेट घेण्याच्या परवानगीसह काही अटी मान्य केल्यास भारताशी पाकिस्तान चर्चा करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमुद कुरेशी यांनी म्हटले आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काश्मीर प्रश्नी भारताशी चर्चा करण्यास तसेच त्रयस्थ देशाची मध्यस्थी स्वीकारण्यास पाकिस्तान तयार आहे. मात्र त्यासाठी पाकिस्तानच्या काही अटी भारताने मान्य करायला हव्यात. ३७० कलम रद्द केल्यानंतर गेल्या महिनाभरापासून काश्मीरमध्ये लागू केलेली संचारबंदी व अन्य निर्बंध भारताने हटविले पाहिजेत. स्थानिक नागरिकांच्या हक्कांची होत असलेली गळचेपी थांबवली पाहिजे. अटक केलेल्या काश्मिरी नेत्यांची भारताने सुटका करावी.कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानने चर्चेला कधीच नकार दिला नव्हता. मात्र अशा चर्चेसाठी भारतच तयार नसल्याचे जाणवत आहे. भारताने परवानगी दिल्यास काश्मीरी नेत्यांची मी भेट घेऊन त्यांची मते जाणून घेणार आहे.काश्मीरी जनतेच्या भावना पायदळी तुडविल्या जाणे थांबायला हवे. आखाती देशांचा भारताशी मोठा व्यापार व उत्तम संबंध आहेत. तरीदेखील या देशांनी काश्मीरबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली असल्याचा दावा कुरेशी यांनी केला.दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता नाहीच्भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी फेटाळून लावली आहे. पाकिस्तानने कधीही आक्रमक पवित्रा घेतला नसून शांती प्रस्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असा दावाही त्यांनी केला. मात्र पाकिस्तानवर युद्ध लादले गेल्यास त्याचा सामना करण्यास आमचे लष्कर व जनता समर्थ आहे अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.च्भारताबरोबर असलेल्या मतभेदांवर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढावा अशी पाकिस्तानची भूमिका आहे.

टॅग्स :BorderसीमारेषाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान