शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:20 IST

Indus Waters Treaty: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सुरुवातीला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सुरुवातीला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. सुमारे तीन दिवस चाललेल्या या संघर्षानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम घोषित केला. मात्र भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेले काही निर्णय कायम ठेवले आहे. त्यापैकी सिंधू पाणी करारही भारताने स्थगित ठेवलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं असून, भारताने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारं पत्र पाकिस्तानने भारताला पाठवलं आहे.

पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तुजा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांना हे पत्र पाठवलं आहे. तसेच या विषयी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी विनंती पाकिस्तानने भारताला केली आहे.

पाकिस्तानने सांगितले की, भारताने तीन नद्यांच्या पाण्यावरील आपल्या अधिकारांचा पूर्ण वापर सुरू केला, तर पाकिस्तानच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होईल. दरम्यान, याचाच विचार करून पाकिस्तानने भारताला चर्चेचं आवाहन केलं आहे. मात्र भारताकडून या विषयी अद्याप कुठलीही मवाळ भूमिका घेण्यात आलेली नाही.

सूत्रांनी सांगितले की, भारत सरकारने पाकिस्तानच्या विनंतीला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या मुद्द्यावर पाकिस्तानला दिलासा देणारा कुठलाही निर्णय भारताकडून सध्यातरी होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानWaterपाणी