शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:20 IST

Indus Waters Treaty: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सुरुवातीला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सुरुवातीला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. सुमारे तीन दिवस चाललेल्या या संघर्षानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम घोषित केला. मात्र भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेले काही निर्णय कायम ठेवले आहे. त्यापैकी सिंधू पाणी करारही भारताने स्थगित ठेवलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं असून, भारताने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारं पत्र पाकिस्तानने भारताला पाठवलं आहे.

पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तुजा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांना हे पत्र पाठवलं आहे. तसेच या विषयी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी विनंती पाकिस्तानने भारताला केली आहे.

पाकिस्तानने सांगितले की, भारताने तीन नद्यांच्या पाण्यावरील आपल्या अधिकारांचा पूर्ण वापर सुरू केला, तर पाकिस्तानच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होईल. दरम्यान, याचाच विचार करून पाकिस्तानने भारताला चर्चेचं आवाहन केलं आहे. मात्र भारताकडून या विषयी अद्याप कुठलीही मवाळ भूमिका घेण्यात आलेली नाही.

सूत्रांनी सांगितले की, भारत सरकारने पाकिस्तानच्या विनंतीला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या मुद्द्यावर पाकिस्तानला दिलासा देणारा कुठलाही निर्णय भारताकडून सध्यातरी होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानWaterपाणी