शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:20 IST

Indus Waters Treaty: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सुरुवातीला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. सुरुवातीला मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. सुमारे तीन दिवस चाललेल्या या संघर्षानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम घोषित केला. मात्र भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेले काही निर्णय कायम ठेवले आहे. त्यापैकी सिंधू पाणी करारही भारताने स्थगित ठेवलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं असून, भारताने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारं पत्र पाकिस्तानने भारताला पाठवलं आहे.

पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तुजा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांना हे पत्र पाठवलं आहे. तसेच या विषयी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी विनंती पाकिस्तानने भारताला केली आहे.

पाकिस्तानने सांगितले की, भारताने तीन नद्यांच्या पाण्यावरील आपल्या अधिकारांचा पूर्ण वापर सुरू केला, तर पाकिस्तानच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होईल. दरम्यान, याचाच विचार करून पाकिस्तानने भारताला चर्चेचं आवाहन केलं आहे. मात्र भारताकडून या विषयी अद्याप कुठलीही मवाळ भूमिका घेण्यात आलेली नाही.

सूत्रांनी सांगितले की, भारत सरकारने पाकिस्तानच्या विनंतीला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या मुद्द्यावर पाकिस्तानला दिलासा देणारा कुठलाही निर्णय भारताकडून सध्यातरी होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानWaterपाणी