शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियातील पापुआमध्ये पूराचा हाहाकार, 79 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 13:15 IST

इंडोनेशियाच्या पापुआ भागात अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे, आत्तापर्यंत 4 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे

पापुआ - इंडोनेशियाच्या पापुआ भागात अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जयपुरा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. पूर आणि भूस्खलनामुळे 116 जण जखमी झाले असून त्यातील 41 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. पूरामुळे अनेक जिल्ह्यांना फटका या आपत्तीमध्ये मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. कारण अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याचं अधिका-यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी जयपूरा जिल्ह्यातील अनेक गावांना पूराचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून जयपुरा भागात पावसाला सुरुवात झाली होती. या परिसारतील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांना पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते पुर्वी नुग्रोहो यांनी सांगितले की,  आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पुरामध्ये बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्याचं काम करत आहे. आत्तापर्यंत 4 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. पूरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या पूरातील पाण्याची पातळी कमी होत असली तरी नागरिकांच्या सुरक्षेचं मोठं आव्हान आमच्या समोर आहे. पूरामुळे अनेक भागात घरं पडली आहेत, झाडं कोसळली आहेत, रस्त्यावर चिखल झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे.

स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार, नदीच्या किनारी असलेल्या उंच भागांमध्ये भूस्खलन झालं आहे, भूस्खलनामुळे नदीपात्रात माती जमा होऊन पाण्याचा प्रवाह रोखला गेला त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. इंडोनेशियामध्ये साधारणपणे ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान अशी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. मागील वर्षी जानेवारी महिन्यात सुलावेसी बेटावर पूर आणि भूस्खलनामुळे 70 लोकांचा मृत्यू झाला होता. 

इंडोनेशियामधील बचाव कार्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूस्खलनामुळे एकाचा घराचा भाग कोसळला, या मलब्याखाली अडकलेल्या एका चिमुकल्याला वाचविण्यात आम्हाला यश आले. पाच महिन्याच्या या चिमुकल्याला त्याच्या वडिलांकडे सुखरुप देण्यात आलं. इंडोनेशिया येथे यापूर्वीही अनेक नैसर्गिक संकटे आली होती. या संकटामुळे येथे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.

टॅग्स :floodपूरIndonesiaइंडोनेशियाNatural Calamityनैसर्गिक आपत्ती