शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:09 IST

पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे.

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. भारताच्या युद्धखोरीच्या भाषेमुळे दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता असून, त्याची आंतरराष्ट्रीय समुदायाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी मांडली होती. त्याबद्दल पाकिस्तानने म्हटले आहे की, अशा वक्तव्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडू शकतात. काश्मीरमध्ये भारताकडून सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली होत असून, त्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाने टीका केली आहे. त्यामुळे हताश झालेला भारत बेजबाबदार वक्तव्ये करीत आहे.पाकिस्तानने सांगितले की, भारत काश्मीरमधील निरपराध लोकांचा छळ करीत असून, त्यावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. दुसऱ्यांना दुषणे देण्यापेक्षा भारताने काश्मीरमधील निर्बंध हटवावेत, आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करणे थांबवावे, तसेच जम्मू-काश्मीर प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी भारताने करावी. (वृत्तसंस्था)>भारताची ठाम भूमिकाकाश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे, जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे हे निर्णय केंद्र सरकारने घेतले.या निर्णयाविरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उघडली. त्याशिवाय भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना परत पाठविले, राजनैतिक संबंध कमी केले. तरीही पाकिस्तानच्या कांगाव्याला जगभरातून पाठिंबा मिळाला नाही.काश्मीरचा प्रश्न भारत व चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, अशीच भूमिका हे देश व संयुक्त राष्ट्रांनी घेतल्याने पाकिस्तान आणखी बिथरला आहे.३७० कलम रद्द करणे हा आमचा अंतर्गत मामला आहे व काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370