शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भारतात मुस्लीमांची लोकसंख्या वाढतेय; अर्थमंत्र्यांचं अमेरिकेतील पत्रकारांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:55 IST

मंत्री निर्मला सितारमण सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला देश भारत आहे. त्यामुळेच, अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावरुन भारताला दोष देणाऱ्यांना देशातील वस्तुस्थिती माहिती नाही, असे म्हणत केंद्रीय मंत्री निर्मला सितारण यांनी विदेशात भारताची बाजू भक्कमपणे मांडली. भारताबद्दल पाश्चिमात्य देशांमध्ये नकारात्मक मत निर्माण झाल्याचे सांगत सितारमण यांनी कणखरपणे सरकारची भूमिका मांडली. भारतात पाकिस्तानपेक्षा मुस्लीमांची संख्या अतिशय चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मंत्री निर्मला सितारमण सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली. पाश्चिमात्य देशात भारताबद्दल नकारात्मक वातावरण तयार केल्याचं म्हटलं. तसेच, याबद्दल उत्तर देताना, भारतात मुस्लिमांची संख्या वाढत असून जगातील भारत हा मुस्लीमांची संख्या असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सन १९४७ च्या तुलनेत भारताची लोकसंख्या वाढत आहे. त्याचवेळी पाकिस्तानही निर्माण झाले, पण तेथील तुलनेत आज भारतातील अल्पसंख्यांकांची स्थिती उत्तम असल्याचं सितारमण यांनी स्पष्ट केलं. 

पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या घटत आहे, विशेष म्हणजे मुस्लीमांच्या लोकसंख्येवरही तेथे परिणाम जाणवत आहे. मात्र, भारतात मुसलमान आपला व्यवसाय करत आहेत. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं जातंय, स्कॉलरशीप देण्यात येते आहे, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, निर्मला सितारमण ह्या आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष आणि वर्ल्ड बँकेच्या वसंत बैठकींत भाग घेण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती पदाच्या अनुषंगाने, दुसरी जी २० अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी अमेरिकेत पोहोचल्या आहेत. यावेळी, भारतात परदेशी गुंतवणूक वाढत असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना म्हटले, याचं उत्तर गुंतवणूकदारांनाच विचारायला हवं.  

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनministerमंत्रीMuslimमुस्लीमAmericaअमेरिका