शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

भारतात मुस्लीमांची लोकसंख्या वाढतेय; अर्थमंत्र्यांचं अमेरिकेतील पत्रकारांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:55 IST

मंत्री निर्मला सितारमण सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला देश भारत आहे. त्यामुळेच, अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावरुन भारताला दोष देणाऱ्यांना देशातील वस्तुस्थिती माहिती नाही, असे म्हणत केंद्रीय मंत्री निर्मला सितारण यांनी विदेशात भारताची बाजू भक्कमपणे मांडली. भारताबद्दल पाश्चिमात्य देशांमध्ये नकारात्मक मत निर्माण झाल्याचे सांगत सितारमण यांनी कणखरपणे सरकारची भूमिका मांडली. भारतात पाकिस्तानपेक्षा मुस्लीमांची संख्या अतिशय चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मंत्री निर्मला सितारमण सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली. पाश्चिमात्य देशात भारताबद्दल नकारात्मक वातावरण तयार केल्याचं म्हटलं. तसेच, याबद्दल उत्तर देताना, भारतात मुस्लिमांची संख्या वाढत असून जगातील भारत हा मुस्लीमांची संख्या असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सन १९४७ च्या तुलनेत भारताची लोकसंख्या वाढत आहे. त्याचवेळी पाकिस्तानही निर्माण झाले, पण तेथील तुलनेत आज भारतातील अल्पसंख्यांकांची स्थिती उत्तम असल्याचं सितारमण यांनी स्पष्ट केलं. 

पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या घटत आहे, विशेष म्हणजे मुस्लीमांच्या लोकसंख्येवरही तेथे परिणाम जाणवत आहे. मात्र, भारतात मुसलमान आपला व्यवसाय करत आहेत. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं जातंय, स्कॉलरशीप देण्यात येते आहे, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, निर्मला सितारमण ह्या आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष आणि वर्ल्ड बँकेच्या वसंत बैठकींत भाग घेण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती पदाच्या अनुषंगाने, दुसरी जी २० अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी अमेरिकेत पोहोचल्या आहेत. यावेळी, भारतात परदेशी गुंतवणूक वाढत असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना म्हटले, याचं उत्तर गुंतवणूकदारांनाच विचारायला हवं.  

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनministerमंत्रीMuslimमुस्लीमAmericaअमेरिका