शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

भारताच्या 'या' निर्णयामुळे पाकिस्तानला सर्वात मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 14:15 IST

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत सीमा कर वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला होता. 

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमाकर आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आर्थिक व्यवहारात आयात वस्तूंमध्ये घट झाली होती. पाकिस्तानचा खूप कमी माल भारतात येऊ लागला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाअंतर्गत सीमा कर वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला होता. 

पाकिस्तानकडून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये कापूस, फळे, सिमेंट, पेट्रोलिअम उत्पादन आणि खनिजांचा समावेश होता. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील वर्षी मार्च 2018 मध्ये पाकिस्तानकडून 3.48 कोटी डॉलरची देवाणघेवाण झाली होती. यंदा या व्यवहारामध्ये घट झाली आहे. पाकिस्तानकडून होणारी आयात यंदा मार्च महिन्यात 2.84 कोटी डॉलर होती. 

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महागाईची झळ सोसत असलेल्या पाकिस्तानात इमरान सरकार अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. पहिल्यांदाच 190 रुपये लिटर दूध विकलं जात आहे. आता सफरचंद 400 रुपये किलो, तर संत्रे 360 रुपये किलोनं विकले जात आहे. तर केळे 150 रुपये डझनानं विकली जात आहेत.  मटणाची किंमत पाकिस्तानात 1100 रुपये किलो आहे. मार्चच्या तुलनेत मेमध्ये कांदा 40 टक्के, टोमॅटो 19 टक्के आमि मुगाची डाळ 13 टक्क्यांहून जास्त किमतीनं विकली जात आहे. साखर, मासे, मसाले, तूप, तांदूळ, पीठ, तेल, चहा, गहू यांच्या किमतीही 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बाजाराचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनुसार ऑटो, सिमेंट आणि फार्मास्युटिकल्स सारख्या उद्योगांना लागणाऱ्या कच्चा मालावरच्या आयातीची किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांवर त्याचा भार पडणार आहे. व्यापाऱ्यांचा बाजारावरचा विश्वास उडाला आहे. 

भारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास 14 वस्तू निर्यात करतो. कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारताकडून घ्याव्या लागणाऱ्या या वस्तूंवर दुप्पट पैसे मोजावे लागले त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान