शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

'भारताच्या बहिष्कारामुळे आमच्या पर्यटनाला फटका बसला'; मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 11:40 IST

काही महिन्यापूर्वी मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्या प्रकरणी वाद सुरू झाला होता, याबाबत आता माजी राष्ट्रपतींनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काही महिन्यापूर्वी मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्या प्रकरणी वाद सुरू झाला होता. यानंतर भारतीयांनीमालदीववर बहिष्कार टाकला होता. यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी चिंता व्यक्त केली. बहिषाकारामुळे देशाच्या पर्यटनावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. मोहम्मद नशीद यांनी मालदीवच्या लोकांच्या वतीने भारतीयांची माफीही मागितली आणि भारतीय पर्यटकांनी आपल्या देशात येत राहावे अशी माझी इच्छा आहे, असं म्हटले आहे.

धक्कादायक! पोटदुखी, उलट्या...; हॉस्टेलमध्ये जेवल्यावर 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

भारत आणि मालदीवमध्ये राजनैतिक वाद सुरूच आहे. दरम्यान, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी भारताने मालदीववर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम आपल्या देशातील पर्यटन क्षेत्रावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मालदीवच्या जनतेच्या वतीने त्यांनी माफीही मागितली. नशीद सध्या भारतात आहेत. दोन्ही देशांमधील तणावाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि मालदीवच्या लोकांना ‘माफ करा’ असे सांगितले.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मालदीववर बहिष्काराचा खूप मोठा परिणाम झाला आहे, आणि मला त्याबद्दल खरोखरच काळजी वाटते. मला आणि मालदीवच्या लोकांना खेद वाटतो, असे मला म्हणायचे आहे." माजी राष्ट्रपतींनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि ते म्हणाले, "मी काल रात्री पंतप्रधानांची भेट घेतली. पीएम मोदींनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा समर्थक आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतो.

बहिष्कारासाठी जबाबदार असलेल्यांना दूर करण्यासाठी विद्यमान राष्ट्रपतींनी केलेल्या तत्पर कारवाईचेही त्यांनी कौतुक केले. माजी राष्ट्रपती म्हणाले, "मला वाटते की या प्रकरणांचे निराकरण केले पाहिजे आणि आपण मार्ग बदलला पाहिजे आणि आपल्या सामान्य संबंधांकडे परत यावे. असंही नशीद म्हणाले.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारत