शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

भारताच्या सय्यद अकबरुद्दीन यांनी केली पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 11:03 IST

काश्मीर प्रश्नावरील चर्चेनंतर सय्यद अकबरुद्दीन यांची पत्रकार परिषद सुरु होती. ज्यात पाकिस्तानचे काही पत्रकारदेखील उपस्थित होते.

संयुक्त राष्टे - काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तान आणि चीन हे संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत तोंडावर आपटले आहेत. उलट या बैठकीत काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याबाबत भारताचं कौतुक करण्यात आलं. या बैठकीबाबत अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आली नाही. मात्र बंद दरवाज्यामागे झालेल्या या बैठकीत भारताची कुटनीती समोर आली. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांच्या हजरजबाबी, तथ्य आणि कुटनीतीच्या उत्तरांनी पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद केली. 

काश्मीर प्रश्नावरील चर्चेनंतर सय्यद अकबरुद्दीन यांची पत्रकार परिषद सुरु होती. ज्यात पाकिस्तानचे काही पत्रकारदेखील उपस्थित होते. पाकचे पत्रकार अकबरुद्दीन यांना काश्मीर आणि मानवाधिकार यावरुन प्रश्न विचारण्यात सुरुवात केली. पाकच्या पत्रकारांनी कलम 370 हटविण्यावरुन सय्यद अकबरुद्दीन यांना घेरण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. कलम 370 मधील सर्वाधिक तरतूदी हटविण्याचा निर्णय भारत सरकारचा आहे आणि भारताचा अंतर्गत मामला आहे असं अचूक उत्तर पत्रकारांना दिलं. 

सय्यद अकबरुद्दीन यांनी सर्वात आधी पाकिस्ताच्या 3 पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. त्यावेळी अकबरुद्दीन यांचा आत्मविश्वास आणि कुटनीती उपस्थितांना दिसली. तुमच्या मनात कोणतीही शंका नको यासाठी मी पहिल्यांदा 3 पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतो असं सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. 

ज्यावेळी पाकिस्तानच्या शेवटच्या पत्रकाराने सय्यद अकबरुद्दीन यांना सवाल केला की, नवी दिल्ली इस्लामाबादमधून कधी वार्तांकन करणार? त्यावर अकबरुद्दीन पोडियमधून पुढे येत आत्मविश्वासाने त्याला बोलले. चला मला याची सुरुवात सर्वांत आधी तुमच्यापासून सुरु करुद्या. मला हात मिळवू द्या. त्यांनी पाकिस्तानच्या तिन्ही पत्रकारांशी हात मिळविले त्यावेळी उपस्थित इतर पत्रकारांना हसू आवरले नाही. त्यानंतर पोडियमवर जाऊन त्यांनी सांगितले आम्ही मैत्रीचा हात पुढे केला आहे. भारत शिमला समझोत्यासाठी कटिबद्ध आहे. फक्त पाकिस्तानकडून उत्तराची अपेक्षा आहे. 

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर भारताची बाजू चोखपणे मांडली.''काश्मीर प्रश्नी भारताकडून सर्व आंतरराष्ट्रीय करारांचे योग्य प्रमाणे पालन करण्यात आले आहे. मात्र काही लोक आपल्या विचारसरणीच्या प्रचारासाठी काश्मीरमधील परिस्थिती भयावह असल्याचा दावा करण्यात येत आहे,'' असे अकबरुद्दीन यांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानUnited StatesअमेरिकाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370