शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी हस्तक्षेपाने शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार नाही: भारतीय उच्चायुक्त

By देवेश फडके | Updated: February 17, 2021 09:22 IST

कृषी कायद्याविरोधात दोन महिन्यांपासून अधिक काळ भारतातील शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहे. दिल्लीतील विविध सीमांवर सुरू असलेल्या या आंदोलनाला केवळ भारतातून नाही, तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. ब्रिटीश संसदेतील सदस्य क्लॉडिया वेब्बी यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता भारतीय उच्चायोगाने एक खुले पत्र काढले आहे.

ठळक मुद्देब्रिटीश संसद सदस्याचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबाटूलकिट प्रकरणात अटक केलेल्या दिशा रविला समर्थनभारतीय उच्चायोगाकडून खुले पत्र

लंडन : कृषी कायद्याविरोधात दोन महिन्यांपासून अधिक काळ भारतातील शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहे. दिल्लीतील विविध सीमांवर सुरू असलेल्या या आंदोलनाला केवळ भारतातून नाही, तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक परदेशातील दिग्गजांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे. ब्रिटीश संसदेतील सदस्य क्लॉडिया वेब्बी यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता भारतीय उच्चायोगाने एक खुले पत्र काढले आहे. या पत्रात परदेशी हस्तक्षेपामुळे शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार नाही, असे म्हटले आहे. (indian high commission writes letter to british mp for supporting farmers protest)

ब्रिटीश संसदीय सदस्य क्लॉडिया यांना उत्तर देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय उच्चायोगाने म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची गैरसमजूत दूर करण्यासाठी भारतीय उच्चायोग ब्रिटीश संसदीय सदस्यांना मदत करेल. वैयक्तिक स्वार्थापोटी परदेशातील व्यक्ती शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची माहिती आणि चिथावणीखोर दावे पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र, भारत सरकार यासंदर्भात अधिक जागरूकतेने काम करत आहे. यांसारखे प्रयत्न भारत सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यातील चर्चा किंवा लोकशाही पद्धतीने मार्ग काढण्यासाठीच्या प्रयत्नांवर प्रभाव पाडू शकणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे. 

'मोदी सरकारने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं', राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

ब्रिटीश संसदेच्या सदस्या क्लॉडिया वेब्बे यांनी एक ट्विट करत भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. याशिवाय ट्विटर टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवि हिला समर्थन असल्याचे सांगितले. यानंतर भारतीय उच्चायोगाने एक खुले पत्र लिहून यावर स्पष्टीकरण दिले. 

भारतात लागू करण्यात आलेले कृषी कायदे तज्ज्ञांची मते, अहवाल, समित्यांच्या शिफारसी यांच्यावर आधारित असून, गेल्या २० वर्षांपासून भारतीय कृषी क्षेत्रात असलेल्या आव्हानांचा आढावा घेतल्यानंतरच कृषी कायदे आणले गेले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांपैकी एक छोटा गट याला विरोध करत आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय संसदेत कृषी विधेयकावर विस्तृत चर्चा केल्यानंतरच याचे कायद्यात रुपांतर करून तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात आली आहे. याचा लाभ सुमारे १० कोटी छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या मुद्द्यांवर आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये ११ वेळा बैठका झाल्या असून, या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनLondonलंडन