शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:32 IST

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात आले आहे, ते अजून संपलेले नाही.

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केले आहे, संपलेले नाही, असेही भारताने स्पष्ट केले आहे. यातच आता पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावे, यासाठी भारताने आक्रमकपणे प्रयत्न सुरू केले आहेत. याचसंदर्भात भारताचे इस्रायलमधील राजदूत जेपी सिंह यांनी मांडलेले मत महत्त्वाचे मानले जात आहे. 

पाकिस्तानने त्यांची विश्वसनीयता सिद्ध करण्यासाठी काही दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करावे, अशी आग्रही भूमिका भारत घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे. हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे. हव्या असलेल्या या दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपविण्यात येणार आहे. भारताचे इस्रायलमधील राजदूत जेपी सिंह यांनी अमेरिकेचा दाखला देत पाकिस्तानला सुनावले आहे.

पाक सईद-लखवी भारताला का देऊ शकत नाही

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वूर राणाचे अमेरिका भारताकडे प्रत्यार्पण करू शकते, तर मग पाकिस्तानने हाफिस सईद, साजिद मीर आणि जकीऊर रहमान लख्वी अशा दहशतवाद्यांना भारताकडे सोपवले पाहिजे. दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे लोकांना मारले. त्यांनी लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि २६ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. भारताची मोहीम दहशतवादी गट आणि त्यांना पुरवल्या जात असलेल्या पायाभूत सुविधांविरुद्ध होती. परंतु, पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले, असे जेपी सिंह यांनी सांगितले. तसेच युद्धविराम सुरूच राहणार का आणि भारतासाठी शेवटचा असेल का? या प्रश्नाला उत्तर देताना जेपी सिंह म्हणाले, युद्धविराम अजूनही कायम आहे, परंतु आम्ही स्पष्ट केले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यात आले आहे, ते अजून संपलेले नाही. इस्रायलमधील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेपी सिंह बोलत होते.

दरम्यान, हाफिज सईद हा २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे. पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. तर, दाऊद इब्राहिम हा १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात महत्त्वाचा सहभाग असलेला हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनला २०१७ मध्ये अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. इंटरपोलने नोटीस जारी केली. तो उघडपणे पाकिस्तानात काम करतो.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIsraelइस्रायलPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला