शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 10:43 IST

पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी लक्ष्य केलं आहे. इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली.भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लंडन - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले असून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारी जवळपास 10 हजार पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या  इमारतीला लक्ष्य केलं. 'काश्मीर फ्रीडम मार्च'  असं नाव पाकिस्तानी समर्थकांनी या विरोध प्रदर्शनाला दिलं होतं. पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. याचं नेतृत्त्व युकेमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केलं.

मोठ्या संख्येने पाकिस्तानी समर्थक या मोर्चामध्ये सामील झाले होते. समर्थकांच्या हातात पाकिस्तान अधिकृत काश्मीर(पीओके)चे झेंडे होते. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करून माहिती दिली आहे. याआधीही 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये निदर्शनं केली होती. 

पाक व्हेंटिलेटरवर! जीवनावश्यक औषधांसाठी भारताकडे विनवणी; व्यापार बंदीनंतर आली नामुष्की

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेभारतासोबत व्यापार संबंध तोडले होते. मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आल्याचं दिसून आलं आहे. व्यापार बंदीला एक महिना झाला तोवर पाकिस्तान भारतासमोर झुकला आहे. जीवनावश्यक औषधांच्या कमतरतेनंतर पाकिस्तानने मंगळवारी भारतातून अंशत: व्यापारावरील  बंदी उठविली आहे. पाकिस्तानने मंगळवारी भारतातून जीवनावश्यक औषधांची आयात करण्याला मंजूरी दिली आहे. पाकिस्तान भारताला फळे, सिमेंट, खनिज, चमड्याच्या वस्तू. रबर, अल्कहोल पेय, चिकित्सा उपकरण या प्रकारच्या अनेक वस्तू निर्यात करतं. तर भारत पाकिस्तानला जैविक रसायन, प्लास्टिक उत्पादन, धान्य, साखर, कॉफी, चहा, लोह आणि स्टीलचे सामान, औषधे इ. वस्तू निर्यात करते. 

पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताकडून औषधे आयात करते. या जीवनावश्यक औषधात साप, कुत्रा यांच्या विषापासून वाचवण्याचं औषधासाठी पाकिस्तानला भारतावर निर्भर राहावं लागतं. जुलै महिन्यात आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने 16 महिन्याच्या कालावधी भारताकडून 250 कोटींहून अधिक किमतीचा व्यापार विषापासून वाचविणाऱ्या औषधांवर केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2017-18 मध्ये 2.4 अरब डॉलर व्यापार झाला होता. द्विपक्षीय व्यापारात जवळपास 80 टक्के भाग पाकिस्तानमध्ये भारतीय निर्यात वस्तूंचा असतो. 

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370