शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 10:43 IST

पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी लक्ष्य केलं आहे. इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली.भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लंडन - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले असून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारी जवळपास 10 हजार पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या  इमारतीला लक्ष्य केलं. 'काश्मीर फ्रीडम मार्च'  असं नाव पाकिस्तानी समर्थकांनी या विरोध प्रदर्शनाला दिलं होतं. पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. याचं नेतृत्त्व युकेमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केलं.

मोठ्या संख्येने पाकिस्तानी समर्थक या मोर्चामध्ये सामील झाले होते. समर्थकांच्या हातात पाकिस्तान अधिकृत काश्मीर(पीओके)चे झेंडे होते. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करून माहिती दिली आहे. याआधीही 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये निदर्शनं केली होती. 

पाक व्हेंटिलेटरवर! जीवनावश्यक औषधांसाठी भारताकडे विनवणी; व्यापार बंदीनंतर आली नामुष्की

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेभारतासोबत व्यापार संबंध तोडले होते. मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आल्याचं दिसून आलं आहे. व्यापार बंदीला एक महिना झाला तोवर पाकिस्तान भारतासमोर झुकला आहे. जीवनावश्यक औषधांच्या कमतरतेनंतर पाकिस्तानने मंगळवारी भारतातून अंशत: व्यापारावरील  बंदी उठविली आहे. पाकिस्तानने मंगळवारी भारतातून जीवनावश्यक औषधांची आयात करण्याला मंजूरी दिली आहे. पाकिस्तान भारताला फळे, सिमेंट, खनिज, चमड्याच्या वस्तू. रबर, अल्कहोल पेय, चिकित्सा उपकरण या प्रकारच्या अनेक वस्तू निर्यात करतं. तर भारत पाकिस्तानला जैविक रसायन, प्लास्टिक उत्पादन, धान्य, साखर, कॉफी, चहा, लोह आणि स्टीलचे सामान, औषधे इ. वस्तू निर्यात करते. 

पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताकडून औषधे आयात करते. या जीवनावश्यक औषधात साप, कुत्रा यांच्या विषापासून वाचवण्याचं औषधासाठी पाकिस्तानला भारतावर निर्भर राहावं लागतं. जुलै महिन्यात आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने 16 महिन्याच्या कालावधी भारताकडून 250 कोटींहून अधिक किमतीचा व्यापार विषापासून वाचविणाऱ्या औषधांवर केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2017-18 मध्ये 2.4 अरब डॉलर व्यापार झाला होता. द्विपक्षीय व्यापारात जवळपास 80 टक्के भाग पाकिस्तानमध्ये भारतीय निर्यात वस्तूंचा असतो. 

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370