शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
4
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
5
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
6
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
7
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
8
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
9
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
10
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
11
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली
12
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
Indian Railways Crisis: '...तर रेल्वेमध्येही इंडिगोसारखी परिस्थिती उद्भवू शकते, थकव्यामुळे धोका वाढवतोय;' आता लोको पायलट्सनं दिला इशारा
14
IPL 2026 Player Auction Full List : १००० खेळाडूंचा पत्ता कट; फायनल यादीत 'या' स्टार क्रिकेटरची सरप्राइज एन्ट्री
15
Palghar: रक्षकच बनले भक्षक! तक्रार घेऊन आलेल्या तरुणीवर अत्याचार, पोलीस कॉन्स्टेबल अटकेत
16
आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर
17
शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशीला बनवलं २४ तास राबणारी नॅनी; राजकीय नेत्याला ४८ लाखांचा दंड!
18
वयाच्या १२ व्या वर्षी अमेरिका सोडून भारतात यावं लागलं; आज बनले YouTube चे सर्वात मोठे बॉस
19
बुलढाणा हादरले! बायको म्हणाली, 'बाहेर जा व मरून जा', शब्द जिव्हारी लागले अन् पतीने लक्ष्मीवर झोपेतच कुऱ्हाडीने केले वार
20
लग्नाच्या ७ वर्षांनी मराठी अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव, म्हणाली- "मी हा निर्णय घेतला कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 10:43 IST

पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी लक्ष्य केलं आहे. इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली.भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लंडन - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीला बुधवारी (4 सप्टेंबर) लक्ष्य केलं आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले असून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबत तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारी जवळपास 10 हजार पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या  इमारतीला लक्ष्य केलं. 'काश्मीर फ्रीडम मार्च'  असं नाव पाकिस्तानी समर्थकांनी या विरोध प्रदर्शनाला दिलं होतं. पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. याचं नेतृत्त्व युकेमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केलं.

मोठ्या संख्येने पाकिस्तानी समर्थक या मोर्चामध्ये सामील झाले होते. समर्थकांच्या हातात पाकिस्तान अधिकृत काश्मीर(पीओके)चे झेंडे होते. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीबाहेर जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अंडी फेकली आहेत. तसेच दगडफेक केली आहे. दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करून माहिती दिली आहे. याआधीही 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये निदर्शनं केली होती. 

पाक व्हेंटिलेटरवर! जीवनावश्यक औषधांसाठी भारताकडे विनवणी; व्यापार बंदीनंतर आली नामुष्की

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेभारतासोबत व्यापार संबंध तोडले होते. मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आल्याचं दिसून आलं आहे. व्यापार बंदीला एक महिना झाला तोवर पाकिस्तान भारतासमोर झुकला आहे. जीवनावश्यक औषधांच्या कमतरतेनंतर पाकिस्तानने मंगळवारी भारतातून अंशत: व्यापारावरील  बंदी उठविली आहे. पाकिस्तानने मंगळवारी भारतातून जीवनावश्यक औषधांची आयात करण्याला मंजूरी दिली आहे. पाकिस्तान भारताला फळे, सिमेंट, खनिज, चमड्याच्या वस्तू. रबर, अल्कहोल पेय, चिकित्सा उपकरण या प्रकारच्या अनेक वस्तू निर्यात करतं. तर भारत पाकिस्तानला जैविक रसायन, प्लास्टिक उत्पादन, धान्य, साखर, कॉफी, चहा, लोह आणि स्टीलचे सामान, औषधे इ. वस्तू निर्यात करते. 

पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताकडून औषधे आयात करते. या जीवनावश्यक औषधात साप, कुत्रा यांच्या विषापासून वाचवण्याचं औषधासाठी पाकिस्तानला भारतावर निर्भर राहावं लागतं. जुलै महिन्यात आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने 16 महिन्याच्या कालावधी भारताकडून 250 कोटींहून अधिक किमतीचा व्यापार विषापासून वाचविणाऱ्या औषधांवर केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2017-18 मध्ये 2.4 अरब डॉलर व्यापार झाला होता. द्विपक्षीय व्यापारात जवळपास 80 टक्के भाग पाकिस्तानमध्ये भारतीय निर्यात वस्तूंचा असतो. 

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370