शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

भारतीय नागरिकांनो लेबनॉन सोडा; युद्धाच्या भीतीने भारत अलर्टवर, ॲडव्हायझरी जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 14:33 IST

बेरूतमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटनुसार, देशात सुमारे ४ हजार भारतीय राहतात. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत. त्याच वेळी, काही बांधकाम आणि कृषी क्षेत्रात आहेत.

इस्त्रायल आणि हिजबुल्ला मधील तणाव आणखी वाढला आहे. या दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता युद्धाबाबत भारत सरकारही सतर्क झाले आहे. भारताने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे. तसेच, भारतीयांना लेबनॉनमध्ये न जाण्यास सांगण्यात आले आहे. इस्रायल लवकरच लेबनॉनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले झाले.

सेर्को मशीनद्वारे पहिले इच्छामरण; अमेरिकेहून आलेल्या महिलेने स्वित्झर्लंडमध्ये मृत्यूला कवटाळले

बेरूतमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, 'लेबनॉनमध्ये आधीच उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना लेबनॉन सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.' त्यात पुढे म्हटले आहे की, 'जे लोक कोणत्याही कारणास्तव तेथे राहत आहेत त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवाव्यात आणि बेरूतमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे.' दूतावासाने ईमेल आयडी- cons.beirut@mea.gov.in आणि आपत्कालीन क्रमांक +96176860128 देखील जारी केला आहे.

बेरूतमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटनुसार, देशात सुमारे ४ हजार भारतीय राहतात. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत. तर काही बांधकाम आणि कृषी क्षेत्रात आहेत. यापूर्वी १ ऑगस्ट रोजी भारतीय दूतावासाने नागरिकांना लेबनॉन सोडण्यास सांगितले होते. हमास आणि हिजबुल्लाच्या नेत्यांच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

नुकतेच इस्रायलचे लष्करप्रमुख हेरजी हलेवी यांनी लष्कराला सांगितले की, लेबनॉनमध्ये सुरू असलेले हवाई हल्ले हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांचा नाश करत राहतील. मैदानावर मोठ्या कारवाईचे संकेतही त्यांनी दिले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले की, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील वाढत्या तणावामुळे मोठ्या प्रमाणावर युद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, यापुढील रक्तपात थांबवण्यासाठी काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. लेबनॉनमध्ये इस्रायल आणि इराण-समर्थित हिजबुल्लाह दहशतवाद्यांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबाराच्या दरम्यान त्यांचे विधान आले आहे. या हिंसाचारामुळे शेकडो लोकांचा जीव गेलाय. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्ध