शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 3:28 PM

यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल.

ठळक मुद्देया चकमकीत चीनचेही 5 सैनिक मारले गेल्याचे समजते.लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावाचे वातावरण आहे. 'गलवान खोऱ्यात डि-एस्कलेशन प्रक्रियेदरम्यान गेल्या रात्री दोन्ही सैन्य समोरा-समोर आले.

बिजिंग :भारत-चीनसीमा वाद सुरू असतानाच, लडाख सीमेवर चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत भारतील लष्कराच्या एका अधिकाऱ्याला आणि दोन जवानांना हौतात्म्य आले. या चकमकीत चीनचेही 5 सैनिक मारले गेल्याचे समजते. चीननेही ही घटना अत्यंत गांभिर्याने घेतली आहे. यासंदर्भात चीनीच्या पराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत, या संपूर्ण प्रकरणावर चीन गंभीर आहे. आम्ही भारताला आवाहन करतो, की त्यांनी एकतर्फी कारवाई सारखे पाऊल उचलू नये आणि हे प्रकरण अधिक वाढवू नये.

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

रॉयटर्स या वृत्त संस्थेने म्हटले आहे, की लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही सैन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल. भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हणण्यात आले आहे, की  'गलवान खोऱ्यात डि-एस्कलेशन प्रक्रियेदरम्यान गेल्या रात्री दोन्ही सैन्य समोरा-समोर आले. यात आपले जवान शहीद झाले. यात एक अधिकारी आणि दोन सैनिकांचा समावेश आहे.

CoronaVirus News: 18 राज्यांतून येतेय 'खूश खबर'; पण, 'या' राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा 'स्फोट'!

भारतावरच केला आरोप -एकीकडे भारताला एकतर्फी पाऊल उचलू नये, असे आवाहन करणारा चीन दुसरीकडे भारतीय लष्करच या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचे म्हणत आहे. चीनने सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सच्या माध्यमाने भारतावर सीमा ओलांडून कराराचे उल्लंघण केल्याचा आरोप केला आहे. चीनने आरोप केला आहे, की भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा हिंसाचार झाला. एवढेच नाही, तर भारताने आपल्या लष्कराला करारानुसार सीमा ओलांडण्यापासून रोखायला हवे. यामुळे अशा प्रकारची चकमक पुन्हा उद्भवणार नाही, असे आवाहनही चीनने केले आहे.

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

...तर चीनचंच मोठं नुकसान -भारत आणि चीन यांच्यात यापूर्वी 1967 मध्ये झाडप झाली होती. म्हणजे बरोबर 53 वर्षांपूर्वी. ही चकमक सिक्किममध्ये उडाली होती. भारत आपल्या हद्दीत 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. यामुळे चीन चिडला होता. 1967च्या या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते.

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषा