शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

'भारत गर्विष्ठ, डोकलाममधील रस्त्याचं बांधकाम सुरुच ठेवणार', चीनचा उद्दामपणा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 15:38 IST

भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव नाही घेत आहे. दरम्यान चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात डोकलाममधील रस्ता आणि इतर बांधकामं सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बीजिंग - भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव नाही घेत आहे. दरम्यान चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात डोकलाममधील रस्ता आणि इतर बांधकामं सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारताकडून यासंबंधी देण्यात येणारी प्रतिक्रिया विचित्र आहे असंही लेखात म्हटलं आहे. या लेखात भारताचा वेडा असा उल्लेख करण्यात आला असून, गर्विष्ठ असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने चुंबी खो-यात एका रस्त्याचं बांधकाम सुरु केलं असून, हा परिसर भारत आणि चीनमधील वादग्रस्त ठिकाणाहून फक्त 10 किमी अंतरावर आहे असे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर उत्तरादाखल हा लेख लिहिण्यात आला आहे. 

लेखात चीनने डोकलाममध्ये कोणतंही नवं बांधकाम सुरु केला नसल्याचा दावा केला आहे. मात्र याचं कारण वेगळं सांगण्यात आलं आहे. लेखानुसार, सध्या बांधकाम करण्यासाठी योग्य हवामान नाही. सोबतच, या क्षेत्रात बांधकाम करण्याचे पुर्ण अधिकार चीनकडे असल्याचा दावाही लेखातून करण्यात आला आहे. डोकलाम चीनचा भाग असून, चीन सरकारच्या नियंत्रणात आहे असा दावाही करण्यात आला आहे. 

चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.

भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे. अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारतात चीनला लागूून असलेल्या सीमेवर, तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आदी राज्यातल्या सीमावर्ती भागात २0२२ पूर्वी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधण्याची तयारी त्यासाठीच भारत सरकारने चालविली आहे. अशी माहिती या सूत्रांकडून प्राप्त झाली.

टॅग्स :DoklamडोकलामchinaचीनIndian Armyभारतीय जवान