शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

'भारत गर्विष्ठ, डोकलाममधील रस्त्याचं बांधकाम सुरुच ठेवणार', चीनचा उद्दामपणा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 15:38 IST

भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव नाही घेत आहे. दरम्यान चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात डोकलाममधील रस्ता आणि इतर बांधकामं सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बीजिंग - भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव नाही घेत आहे. दरम्यान चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात डोकलाममधील रस्ता आणि इतर बांधकामं सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारताकडून यासंबंधी देण्यात येणारी प्रतिक्रिया विचित्र आहे असंही लेखात म्हटलं आहे. या लेखात भारताचा वेडा असा उल्लेख करण्यात आला असून, गर्विष्ठ असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने चुंबी खो-यात एका रस्त्याचं बांधकाम सुरु केलं असून, हा परिसर भारत आणि चीनमधील वादग्रस्त ठिकाणाहून फक्त 10 किमी अंतरावर आहे असे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर उत्तरादाखल हा लेख लिहिण्यात आला आहे. 

लेखात चीनने डोकलाममध्ये कोणतंही नवं बांधकाम सुरु केला नसल्याचा दावा केला आहे. मात्र याचं कारण वेगळं सांगण्यात आलं आहे. लेखानुसार, सध्या बांधकाम करण्यासाठी योग्य हवामान नाही. सोबतच, या क्षेत्रात बांधकाम करण्याचे पुर्ण अधिकार चीनकडे असल्याचा दावाही लेखातून करण्यात आला आहे. डोकलाम चीनचा भाग असून, चीन सरकारच्या नियंत्रणात आहे असा दावाही करण्यात आला आहे. 

चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.

भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे. अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारतात चीनला लागूून असलेल्या सीमेवर, तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आदी राज्यातल्या सीमावर्ती भागात २0२२ पूर्वी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधण्याची तयारी त्यासाठीच भारत सरकारने चालविली आहे. अशी माहिती या सूत्रांकडून प्राप्त झाली.

टॅग्स :DoklamडोकलामchinaचीनIndian Armyभारतीय जवान