शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:08 IST

India Vs Pakistan War: भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन परदेशी आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानचे पाणी बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानने ही युद्धाचीच घोषणा असल्याचा दावा करत अधिकारासाठी लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच एलओसी मानणारा शिमला करारही निलंबित केला आहे. या हल्ल्याचा भारत बदला घेणार अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यामुळे पाकिस्तानने रणगाडे, मिसाईल आदी शस्त्रास्त्रे सीमेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. एकप्रकारे पाकिस्तान युद्धाची तयारी करू लागला आहे. 

याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन पाकिस्तानी आहेत. या सर्वांचा शोध घेतला जात आहे. २२ मार्चला हल्ला झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाकिस्तानी लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली होती. ही त्यांची कृती नेहमीची नव्हती. तसेच भारतीय सीमेजवळून टेहळणी विमानही गेले होते. आता पाकिस्तान भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणत असल्याचे समोर येत आहे. 

सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये पाकिस्तानी सैन्य सीमेवर मोठ्या प्रमाणावर हालचाली करत आहे. दोन अतिरिक्त रेजिमेंट तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच टँक, चिलखती वाहने देखील मोठ्या संख्येने सीमेकडे नेली जात आहेत. लढाऊ विमाने कमी उंचीवरून उडण्याचा सराव करत आहेत. 

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

भारत काय करतोय...पाकिस्तानने तिकडे तयारी सुरु केलेली असताना भारतानेही तयारी सुरु केलेली आहे. हवाई दलाने राजस्थानमध्ये युद्धाभ्यास सुरु केला आहे. यामध्ये राफेल लढाऊ विमाने देखील सहभागी झाली आहेत. हवेतून सपाट जमिनीवर तसेच डोंगररागांमध्ये हल्ला करण्याचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. याचे नाव आक्रमण असे ठेवण्यात आले आहे. तसेच भारतीय सैन्याला सीमेवर अलर्टवर ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत