शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

India Replay to Pakistan Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांच्या काश्मीर प्रस्तावाला भारताचा जबरदस्त रिप्लाय; अमेरिकाही आली सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:27 IST

India-US 2+2 Dialogue: अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना शुभेच्छा दिल्या आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरुन खास संदेशही दिला.

वॉशिंग्टन: पाकिस्तानमध्ये काल नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तत्पूर्वी त्यांनी मोदींना काश्मीरवर चर्चेचा प्रस्ताव देताना आम्ही काश्मीरींना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे म्हटले. तसेच भारताला पाकने कसे गुडघ्यावर टेकायला भाग पाडलेले, अशी शेखी मिरविली. यावर आता भारताने शरीफ यांना जबरदस्त उत्तर दिले आहे.

शाहबाज शरीफ यांना भारत आणि अमेरिकेने संदेश देताना म्हटले की, पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तात्काळ आणि कायमची कारवाई करावी, पाकिस्तानाच्या नियंत्रणात असलेल्या कोणत्याही भूभागाचा दहशतवादी हल्ल्यांसाठी वापर केला जाऊ नये, 26/11 आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना न्यायालयाच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी केली आहे.

राजनाथ सिंह यांचा संदेश

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना दहशतवादाच्या मुद्द्यावरुन एक खास संदेश पाठवला आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "मला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना एवढेच म्हणायचे आहे की, त्यांनी दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने काम करावे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत."

2+2 चर्चेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित एएनआयशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, "हे स्पष्ट आहे की जेव्हाही द्विपक्षीय चर्चा होते, तेव्हा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला जातो. अमेरिकेसोबतच्या 2+2 चर्चेदरम्यान आम्ही यावर चर्चा केली. अमेरिकेच्या बाजूने आश्वासनाचा प्रश्नच येत नाही, आम्ही फक्त चर्चा केली आहे."

संरक्षणमंत्र्यांचे आवाहन...यावेळी संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकन कंपन्यांना भारतात येऊन गुंतवणूक करण्याचे आणि 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही अमेरिकन कंपन्यांना उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये काम करण्यास आणि त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सांगितले आहे.

भारत-अमेरिका मोठी संरक्षण भागीदारी महत्त्वाची भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांसाठी मोठी संरक्षण भागीदारी महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. एक मोठा देश, हिंद महासागराचे केंद्र आणि लोकशाही म्हणून भारताच्या 'ऍक्ट ईस्ट' आणि 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाच्या विस्तृत हिंद पॅसिफिक आणि हिंदी महासागर क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पारंपारिक आणि उदयोन्मुख संरक्षण क्षेत्रात भारत आपली क्षमता दुप्पट करण्यासाठी अमेरिकेसोबत काम करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका