शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

भारताचे थायलंडसोबत हृदय, विश्वास, आत्मा आणि अध्यात्माचे नाते - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 19:58 IST

थायलंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे स्वासदी मोदी कार्यक्रमातून भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.

बँकॉक -  थायलंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे स्वासदी मोदी कार्यक्रमातून भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीथायलंडसोबतभारताचे असलेले नाते हे  हृदय, विश्वास, आत्मा आणि अध्यात्माचे नाते असल्याचे सांगितले. तसेच आधुनिक काळात भारत आणि थायलंडमधील दळणवळणाच्या सुविधा वाढत आहेत, दोन्ही देशांदरम्यान आठवडाभरात 300 विनामांची ये जा होते, तसेच भारतामधील 18 ठिकाणे थेट थायलंडशी जोडली गेली असल्याचेही मोदींनी सांगितले. यावेळी आपल्या सरकारने केलेली विविध विकासकामे तसेच कलम 370 हटवण्यासाठी उचललेल्या पावलांचाही उल्लेख केला. 

अमेरिकेत झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाप्रमाणे बँकॉकमध्ये सवास्डी मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ''प्राचीन काळातील सुवर्णभूमी असलेल्या थायलंडमध्ये तुम्हा सर्वांसोबत असताना कुठे परदेशात आलो आहे, असे वाटत नाही. हे वातावरण, ही वेशभूषा पाहिल्यावर सर्वत्र आपलेपणाचा भास होतो. तुम्ही केवळ भारतीय वंशाचे आहात म्हणून नव्हे तर थायलंडच्या कणाकणात जनमनात आपलेपणा झळकतो.'' यावेळी थायलंडसोबत असलेल्या उत्तम दळणवळणाचा उल्लेखही मोदींनी केला. दोन्ही देशांदरम्यान आठवडाभरात 300 विनामांची ये जा होते, तसेच भारतामधील 18 ठिकाणे थेट थायलंडशी जोडली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशातील 130 कोटी नागरिक नवा भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहा सात वर्षांपूर्वी भारतात जाऊन आलेल्यांनी पुन्हा देशाला भेट देऊन देशात घडत असलेले बदल पाहावेत, असे आवाहन मोदींनी यावेळी केले. यावेळी आपल्या सरकारने पाच वर्षांत केलेली कामे आणि त्याला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सरकारला दिलेल्या जनादेशाचाही उल्लेख केला. "यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांसोबत महिलांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत 60 वर्षांनंतर प्रथमच एक अशी घटना घडली. ती म्हणजे पाच वर्षे सरकार चालवल्यानंतर त्याच सरकारल्या आधीच्यापेक्षा मोठा जनादेश मिळाला आहे. 60 वर्षांपूर्वी असे एकदा घडले होते. गेल्या पाच वर्षांत केलेल्या चांगल्या कामामुळेच हा जनादेश मिळाला."असे मोदींनी सांगितले. त्याबरोबरच दहशतवाद आणि कलम 370 चा उल्लेखही मोदींनी केला. दहशत आणि दहशतवादासाठी कारणीभूत ठरलेली गोष्ट हटवण्याचे काम आम्ही केले. कलम 370 हटवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला, असे मोदींनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी उभे राहून मोदींना दाद दिली. ही दाद भारतातील प्रत्येक खासदारासाठी शक्ती बनेल, अशा शब्दात मोदींनी आभार मानले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीThailandथायलंडIndiaभारत