शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

भारताचे थायलंडसोबत हृदय, विश्वास, आत्मा आणि अध्यात्माचे नाते - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 19:58 IST

थायलंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे स्वासदी मोदी कार्यक्रमातून भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.

बँकॉक -  थायलंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे स्वासदी मोदी कार्यक्रमातून भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीथायलंडसोबतभारताचे असलेले नाते हे  हृदय, विश्वास, आत्मा आणि अध्यात्माचे नाते असल्याचे सांगितले. तसेच आधुनिक काळात भारत आणि थायलंडमधील दळणवळणाच्या सुविधा वाढत आहेत, दोन्ही देशांदरम्यान आठवडाभरात 300 विनामांची ये जा होते, तसेच भारतामधील 18 ठिकाणे थेट थायलंडशी जोडली गेली असल्याचेही मोदींनी सांगितले. यावेळी आपल्या सरकारने केलेली विविध विकासकामे तसेच कलम 370 हटवण्यासाठी उचललेल्या पावलांचाही उल्लेख केला. 

अमेरिकेत झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाप्रमाणे बँकॉकमध्ये सवास्डी मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ''प्राचीन काळातील सुवर्णभूमी असलेल्या थायलंडमध्ये तुम्हा सर्वांसोबत असताना कुठे परदेशात आलो आहे, असे वाटत नाही. हे वातावरण, ही वेशभूषा पाहिल्यावर सर्वत्र आपलेपणाचा भास होतो. तुम्ही केवळ भारतीय वंशाचे आहात म्हणून नव्हे तर थायलंडच्या कणाकणात जनमनात आपलेपणा झळकतो.'' यावेळी थायलंडसोबत असलेल्या उत्तम दळणवळणाचा उल्लेखही मोदींनी केला. दोन्ही देशांदरम्यान आठवडाभरात 300 विनामांची ये जा होते, तसेच भारतामधील 18 ठिकाणे थेट थायलंडशी जोडली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशातील 130 कोटी नागरिक नवा भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहा सात वर्षांपूर्वी भारतात जाऊन आलेल्यांनी पुन्हा देशाला भेट देऊन देशात घडत असलेले बदल पाहावेत, असे आवाहन मोदींनी यावेळी केले. यावेळी आपल्या सरकारने पाच वर्षांत केलेली कामे आणि त्याला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सरकारला दिलेल्या जनादेशाचाही उल्लेख केला. "यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांसोबत महिलांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत 60 वर्षांनंतर प्रथमच एक अशी घटना घडली. ती म्हणजे पाच वर्षे सरकार चालवल्यानंतर त्याच सरकारल्या आधीच्यापेक्षा मोठा जनादेश मिळाला आहे. 60 वर्षांपूर्वी असे एकदा घडले होते. गेल्या पाच वर्षांत केलेल्या चांगल्या कामामुळेच हा जनादेश मिळाला."असे मोदींनी सांगितले. त्याबरोबरच दहशतवाद आणि कलम 370 चा उल्लेखही मोदींनी केला. दहशत आणि दहशतवादासाठी कारणीभूत ठरलेली गोष्ट हटवण्याचे काम आम्ही केले. कलम 370 हटवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला, असे मोदींनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी उभे राहून मोदींना दाद दिली. ही दाद भारतातील प्रत्येक खासदारासाठी शक्ती बनेल, अशा शब्दात मोदींनी आभार मानले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीThailandथायलंडIndiaभारत