शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

वायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 12:14 IST

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं नेतृत्व करणा-या प्रतिनिधीनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.

वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं नेतृत्व करणा-या प्रतिनिधीनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. वायफळ बडबड केल्यानं कधीही सत्य परिस्थिती बदलत नसते, असं म्हणत भारतानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानं भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिहा लोदी यांनी महासभेत हिंसाचार, जातीय वाद या विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या नरसंहाराचा हवाला दिला. त्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी संदीप कुमार बाय्यपू यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, गेल्या एक दशकापासून संवेदनशील असलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा होतेय. त्याच वेळी पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं भारतातल्या जम्मू-काश्मीरचा चुकीच्या पद्धतीनं हवाला देत मंचाचा दुरुपयोग केला आहे. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची पाकची कूटनीती नेहमीच अयशस्वी राहिली आहे आणि त्या देशाला कोणाचंही समर्थन मिळालेलं नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे पाकिस्ताननं कितीही वायफळ बडबड केली तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही, असंही संदीप म्हणाले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर