शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

वायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 12:14 IST

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं नेतृत्व करणा-या प्रतिनिधीनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.

वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं नेतृत्व करणा-या प्रतिनिधीनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. वायफळ बडबड केल्यानं कधीही सत्य परिस्थिती बदलत नसते, असं म्हणत भारतानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानं भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिहा लोदी यांनी महासभेत हिंसाचार, जातीय वाद या विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या नरसंहाराचा हवाला दिला. त्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी संदीप कुमार बाय्यपू यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, गेल्या एक दशकापासून संवेदनशील असलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा होतेय. त्याच वेळी पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं भारतातल्या जम्मू-काश्मीरचा चुकीच्या पद्धतीनं हवाला देत मंचाचा दुरुपयोग केला आहे. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची पाकची कूटनीती नेहमीच अयशस्वी राहिली आहे आणि त्या देशाला कोणाचंही समर्थन मिळालेलं नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे पाकिस्ताननं कितीही वायफळ बडबड केली तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही, असंही संदीप म्हणाले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर