शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनवर मात; ४ वर्षांसाठी स्टॅटिस्टीकल बॉडीत स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 08:43 IST

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची ताकद सातत्यानं वाढत आहे.

संयुक्त राष्ट्रामध्ये भारताची ताकद सातत्यानं वाढत आहे. भारताची चार वर्षांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च सांख्यिकी आयोगावर निवड झाली असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली. "भारताची १ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार्‍या ४ वर्षांच्या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च सांख्यिकी आयोगासाठी निवड झाली आहे. विजयाबद्दल अभिनंदन,” असं ट्वीट एस जयशंकर यांनी केलं.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाच्या निवडणुकीत भारताला ५३ मतांपैकी ४६ मतं, दक्षिण कोरियाला २३ मतं, चीनला १९ आणि यूएईला १५ मतं मिळाली. भारताने या सर्व देशांना मागे टाकत हा विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत २ जागांसाठी ४ उमेदवार होते.

सांख्यिकी, विविधता आणि लोकसंख्याशास्त्र या क्षेत्रातील भारताच्या कौशल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगामध्ये भारताला स्थान मिळालं आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाची स्थापना १९४७ मध्ये करण्यात आली होती. ही साख्यिकीय प्रणालीची जगातील सर्वोच्च संस्था आहे.

या संस्थेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या २४ सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे, जे समान भौगोलिक वितरणाच्या आधारावर संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या वतीने निवडले जातात. याच्या सदस्यांमध्ये पाच आफ्रिकन देश, चार आशिया-पॅसिफिक प्रदेश, चार पूर्व युरोप, चार लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेश आणि पश्चिम युरोपमधील सात देशांचा समावेश आहे.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतchinaचीनS. Jaishankarएस. जयशंकर