शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'भारताने कोरोनाच्या लढाईत 150 पेक्षा अधिक देशांना वैद्यकीय मदत केली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 22:11 IST

कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना, भारताचा रिकव्हरी रेट सर्वात चांगला असल्याचे मोदींनी म्हटले

ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत भारताने 150 पेक्षा अधिक देशांत वैद्यकीय मदत पोहोचवली आहे. भारताने गतीमानता व एकता दाखवत संकटांना तोंड दिल्याचे मोदी म्हटले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रात सुधारणेला वाव असल्याचंही मोदी म्हणाले. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेत (ECOSOC) संबोधित करताना भारताच्या विकासाचा आलेखच जगासमोर मांडला. यावेळी, केवळ मोदी सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा उल्लेख न करता, जगाच्या विकासात भारताच्या योगदानाबद्दल भाष्य केलं. भारताने कोरोनाच्या लढाईत दिलेलं योगदान, आणि जगभरातील देशांना केलेल्या वैद्यकीय मदतीचा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला.

कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना, भारताचा रिकव्हरी रेट सर्वात चांगला असल्याचे मोदींनी म्हटले. कोरोनाची लढाई आम्ही जनआंदोलन केली, त्यामुळे या संकटाचा सामना सर्वांनीच मोठ्या हिंमतीने आणि कष्टाने केला. याचा परिणाम म्हणूनच भारताचा रिकव्हरी रेट जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मोदींनी सांगितले. 

जगातील विकासात भारताच्या योगदानाचा उल्लेख करताना, भूकंप असो, चक्रीवादळ असो वा इबोलाचे संकट असो किंवा इतर मानवनिर्मित संकट असो. भारताने मोठ्या हिमतीने त्याचा सामना केला आहे. कोरोनाच्या लढाईत भारताने 150 पेक्षा अधिक देशांत वैद्यकीय मदत पोहोचवली आहे. भारताने गतीमानता व एकता दाखवत संकटांना तोंड दिल्याचे मोदी म्हटले. 

आपल्या भाषणात देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा देण्यात येत असल्याचंही मोदंनी सांगितलं. भारत देश आपल्या 75 व्या स्वातंत्र्यप्राप्त वर्षाचा सोहळा आयोजित करेल, तेव्हा हाऊसिंग फॉर ऑल 2022 कार्यक्रमांतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाच्या डोक्यावर छत असेल, असे मोदी म्हणाले. देशातील 6 लाख गावांमध्ये स्वच्छता करुन, आम्ही महात्मा गांधी यांची 150 व्या जयंती साजरी केली. दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रात सुधारणेला वाव असल्याचंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीUnited Statesअमेरिका