शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:45 IST

लवकरच एक अंतरिम बलूच सरकार बनवले जाईल. ज्यात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल असं मीर यार बलूच यांनी म्हटलं.

पाकिस्तानविरोधात बलूचिस्तानमधील लोकांनी स्वातंत्र्याची लढाई आणखी आक्रमक केली आहे. सोशल मीडियात बलूच नेता मीर यार बलूचने बलूचिस्तान पाकिस्तानपासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली, त्यानंतर Republic of Balochistan Announced असा ट्रेंड सुरू झाला. या घोषणेनंतर भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्राकडे एकापाठोपाठ एक मागण्या सुरू केल्या आहेत. 

बलूच कार्यकर्ता आणि लेखक मीर यार बलूच यांनी सोशल मीडियावर बलूचिस्तान स्वातंत्र्याची घोषणा करत लिहिलं की, आम्ही आमच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा दहशतवादी प्रयोग आता कोसळणार आहे. भारत सरकार बलूचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी. त्याशिवाय बलूच स्वातंत्रता सैनिकांनी डेरा बगुती इथल्या गॅस प्रकल्पावर हल्ला केला. जे पाकिस्तानातील मोठे गॅस पुरवठा केंद्र आहे असं त्यांनी सांगितले. 

बलूच नेत्याने संयुक्त राष्ट्राकडेही अपील केले आहे. संयुक्त राष्ट्राने त्यांचे शांतता सैनिक बलूचिस्तानात पाठवावे आणि पाकिस्तानी सैन्याला आमच्या जमिनीवरुन, समुद्रातून आणि हवाई हद्दीतून बाहेर काढावे. पाकिस्तानी सैन्याची सर्व संपत्ती बलूचिस्तानला सोपवली जावी. सर्व गैर बलूच सैनिक, आयएसआय आणि प्रशासकीय अधिकारी यांनी प्रदेश सोडावा अशी मागणीही मीर यार बलूच यांनी केली.

नव्या सरकारची तयारी, महिला कॅबिनेटचा दावा

लवकरच एक अंतरिम बलूच सरकार बनवले जाईल. ज्यात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल. स्वातंत्र सरकारचा समारंभही लवकर होईल. आम्ही जगातील मित्र देशांच्या राष्ट्राध्यक्षांना या सोहळ्यात आमंत्रित करत आहोत असं मीर यार बलूच यांनी म्हटलं.

BLA ने सैन्य वाहन उडवले, १४ पाक सैनिक ठार

एका व्हिडिओत पाकिस्तानी सैन्याचे वाहन बॉम्बने उडवल्याचे दिसून येते. बलूच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्यात १४ पाकिस्तानी जवान ठार झाल्याचे सांगितले. लंडनमध्ये राहणाऱ्या फ्री बलूचिस्तान मूवमेंटचे नेते हिर्बयार मीर यांनी मुंबईतील जिन्ना हाऊसला बलूचिस्तान हाऊसमध्ये बदलावे अशी मागणी भारताकडे केली आहे. जेव्हा पाकिस्तानी संस्थापक जिन्नाने भारताच्या फाळणीचा प्लॅन बनवला होता तेव्हापासून बलूच स्वातंत्र्याची लढाई लढत आहे. बलूच मुद्द्याकडे १९४७ पासून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत मीर यांनी संयुक्त राष्ट्रावर पक्षपातीपणाचा आरोप केला. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर