शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 08:42 IST

भलेही दोन्ही देशांनी एकमेकांना प्रचंड नुकसान पोहचवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष आणि मोठे नुकसान भारताने पाकिस्तानचे केले आहे असं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरमधूनपाकिस्तानात जोरदार हल्ला केला. त्यात अनेक दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. मात्र या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्ताननेभारताच्या सीमेवरील नागरी वस्त्त्यांवर भ्याड ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकचे हे हल्ले भारताच्या एअर डिफेन्स प्रणालीने हाणून पाडले परंतु या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकच्या सैन्य एअरबेसवर हल्ले केले. त्यात पाकिस्तानचे प्रचंड मोठे नुकसान झाले. भारताच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली. या ४ दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानी सैन्य आणि एअरबेसला टार्गेट करण्यात भारताला यश आले असं अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हायरिजॉल्यूशन सॅटेलाईट फोटोच्या सहाय्याने हा रिपोर्ट तयार केला आहे.

रिपोर्टनुसार, भारताचे हल्ले प्रभावी आणि चांगल्या प्रकारे लक्ष्यित होते. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य एअरबेसला मोठे नुकसान झाले. भारत-पाकिस्तानातील हा संघर्ष गेल्या ५० वर्षातील सर्वात मोठा होता. ज्यात ड्रोन आणि मिसाईलचा पुरेपूर उपयोग करण्यात आला. सॅटेलाईट फोटोत पाहिले तर हे हल्ले व्यापक होते, परंतु नुकसान दाव्याच्या तुलनेत मर्यादीत होते असं त्यात उल्लेख आहे.

भारत वरचढ ठरला - रिपोर्ट

सॅटेलाईट फोटोवरून स्पष्ट दिसते की, भलेही दोन्ही देशांनी एकमेकांना प्रचंड नुकसान पोहचवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष आणि मोठे नुकसान भारताने पाकिस्तानचे केले आहे. आधुनिक युद्धप्रणाली, सशस्त्र क्षमतेचा वापर करून दोन्ही देशांनी हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. परंतु भारताने विशेषत: पाकिस्तानी हवाई दलाच्या क्षमता आणि एअरफिल्ड्सला टार्गेट केले. 

भोलारी एअरबेसवर हल्ला

सर्वात महत्त्वाच्या हल्ल्यांपैकी एक कराची येथील भोलारी एअरबेसवर भारताने केलेला हल्ला आहे. ज्याठिकाणचे सॅटेलाईट फोटोमध्ये स्पष्टपणे विमान हँगरला नुकसान पोहचल्याचे दिसते. पाकिस्तानच्या कराचीपासून १०० मैल दूर असलेल्या भोलारी एअरबेसवर भारताने एअरक्राफ्टच्या मदतीने टार्गेट हल्ला केला. 

नूर खान एअरबेस - सर्वात संवेदनशील टार्गेट

भारताने पाकिस्तानच्या सर्वात संवेदनशील असलेल्या नूर खान एअरबेसवर हल्ला केला. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हा एअरबेस आहे. सैन्य मुख्यालय आणि पंतप्रधान कार्यालयही जवळ आहे. हे युनिट पाकिस्तानच्या अण्वस्त्राची सुरक्षा करते. येथेही भारताने अचूक हल्ला करत मोठे नुकसान पोहचवले. 

पाकिस्तानचे दावे पोकळ

भारताच्या या हल्ल्याला पाकिस्तानी सैन्यानेही प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, त्यांनी भारताच्या उधमपूर एअरबेसवर हल्ला केला परंतु १२ मे रोजी घेतलेल्या सॅटेलाईट फोटोत याचे काही पुरावे सापडत नाहीत. या एअरबेसवर कुठेही नुकसान झाले नसल्याचं दिसून येते. ४ दिवस चाललेल्या या संघर्षात १० मे रोजी भारत-पाकिस्तानात युद्धविराम करण्यावर सहमती झाली. या संपूर्ण प्रकरणी भारताच्या सैन्य कारवाईत पाकिस्तानच्या युद्धक्षमतेची पोलखोल झाली. ज्याची पुष्टी जागतिक माध्यमे, सॅटेलाईट डेटा करत आहेत.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर