शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:08 IST

भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी पाकिस्तानी राजदूत जमालीने घेतली आहे.

कराची - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच पाकिस्ताननं पुन्हा एकदा अणुहल्ल्याची पोकळ धमकी भारताला दिली आहे. रशियात पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमालीने ही धमकी दिली आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला अथवा सिंधु नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान केवळ पारंपारिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनीही प्रत्युत्तर देईल असं खालिद जमालीने म्हटलं आहे.

रशियन टीव्ही चॅनेलला त्याची मुलाखत झाली. त्यात पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, आमच्याकडे भारताकडून सैन्य कारवाई करण्याच्या प्लॅनिंगचे ठोस पुरावे आहेत. काही लीक झालेल्या कागदपत्रानुसार पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करण्याची योजना बनवली आहे. हा हल्ला लवकरच होऊ शकतो, कधीही होऊ शकतो असा दावा त्यांनी केला. पाकिस्तान कुठल्याही हल्ल्याला पूर्ण ताकदीनं उत्तर देईल. ज्यात पारंपारिक आणि अणुवस्त्राचाही समावेश असेल असं त्यांनी सांगितले.

तसेच सिंधु जल करार स्थगितीवर त्याने भाष्य केले. भारताने जर खालील भागात पाणी रोखले तर ते पाकिस्तानविरोधात एक्ट ऑफ वॉर मानले जाईल त्याचे उत्तर आम्ही सैन्य कारवाईने देऊ. भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी. त्यात चीन, रशियाने पुढाकार घ्यावा अशी मागणीही पाकिस्तानी राजदूत जमालीने केली.

पाकविरोधात भारताची कठोर पावले

२२ एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्यात निष्पाप २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. भारताने या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला खुली सूट दिली आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना थेट इशाराही दिला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी