शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:08 IST

भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी पाकिस्तानी राजदूत जमालीने घेतली आहे.

कराची - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच पाकिस्ताननं पुन्हा एकदा अणुहल्ल्याची पोकळ धमकी भारताला दिली आहे. रशियात पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमालीने ही धमकी दिली आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला अथवा सिंधु नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान केवळ पारंपारिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनीही प्रत्युत्तर देईल असं खालिद जमालीने म्हटलं आहे.

रशियन टीव्ही चॅनेलला त्याची मुलाखत झाली. त्यात पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, आमच्याकडे भारताकडून सैन्य कारवाई करण्याच्या प्लॅनिंगचे ठोस पुरावे आहेत. काही लीक झालेल्या कागदपत्रानुसार पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करण्याची योजना बनवली आहे. हा हल्ला लवकरच होऊ शकतो, कधीही होऊ शकतो असा दावा त्यांनी केला. पाकिस्तान कुठल्याही हल्ल्याला पूर्ण ताकदीनं उत्तर देईल. ज्यात पारंपारिक आणि अणुवस्त्राचाही समावेश असेल असं त्यांनी सांगितले.

तसेच सिंधु जल करार स्थगितीवर त्याने भाष्य केले. भारताने जर खालील भागात पाणी रोखले तर ते पाकिस्तानविरोधात एक्ट ऑफ वॉर मानले जाईल त्याचे उत्तर आम्ही सैन्य कारवाईने देऊ. भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी. त्यात चीन, रशियाने पुढाकार घ्यावा अशी मागणीही पाकिस्तानी राजदूत जमालीने केली.

पाकविरोधात भारताची कठोर पावले

२२ एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्यात निष्पाप २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. भारताने या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला खुली सूट दिली आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना थेट इशाराही दिला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी