शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:08 IST

भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी पाकिस्तानी राजदूत जमालीने घेतली आहे.

कराची - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच पाकिस्ताननं पुन्हा एकदा अणुहल्ल्याची पोकळ धमकी भारताला दिली आहे. रशियात पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमालीने ही धमकी दिली आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला अथवा सिंधु नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान केवळ पारंपारिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनीही प्रत्युत्तर देईल असं खालिद जमालीने म्हटलं आहे.

रशियन टीव्ही चॅनेलला त्याची मुलाखत झाली. त्यात पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, आमच्याकडे भारताकडून सैन्य कारवाई करण्याच्या प्लॅनिंगचे ठोस पुरावे आहेत. काही लीक झालेल्या कागदपत्रानुसार पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करण्याची योजना बनवली आहे. हा हल्ला लवकरच होऊ शकतो, कधीही होऊ शकतो असा दावा त्यांनी केला. पाकिस्तान कुठल्याही हल्ल्याला पूर्ण ताकदीनं उत्तर देईल. ज्यात पारंपारिक आणि अणुवस्त्राचाही समावेश असेल असं त्यांनी सांगितले.

तसेच सिंधु जल करार स्थगितीवर त्याने भाष्य केले. भारताने जर खालील भागात पाणी रोखले तर ते पाकिस्तानविरोधात एक्ट ऑफ वॉर मानले जाईल त्याचे उत्तर आम्ही सैन्य कारवाईने देऊ. भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी. त्यात चीन, रशियाने पुढाकार घ्यावा अशी मागणीही पाकिस्तानी राजदूत जमालीने केली.

पाकविरोधात भारताची कठोर पावले

२२ एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्यात निष्पाप २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. भारताने या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला खुली सूट दिली आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना थेट इशाराही दिला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी