शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
5
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
6
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
7
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
8
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
9
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
10
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
11
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
12
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
13
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
14
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
15
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
16
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
17
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
18
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
19
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
20
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार

‘नाम’ देशांच्या शिखर परिषदेत भारत-पाकिस्तानची खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:18 IST

पाक दहशतवादाचा केंद्रबिंदू : काश्मीरवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

बाकू (अझरबैजान) : अलिप्त राष्ट्र चळवळीच्या (नाम) येथे झालेल्या १८ व्या शिखर परिषदेत भारतपाकिस्तान यांच्यात काश्मीरवरून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरीफ अल्वी व भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या भाषणांमध्ये काश्मीरवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

परिषदेत आधी भाषण करताना अल्वी यांनी भारताने काश्मीरच्या संदर्भात अलीकडेच उचललेली पावले ‘बेकायदा, अनैतिक व अवैध’ असल्याचा दावा केला. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याची भारताची कृती ‘आजच्या काळात ज्याची अन्य कशाशी तुलना होऊ शकत नाही असा जुलूम’ असल्याचा त्यांनी आरोप केला. काश्मिरी जनता त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी देत असलेल्या लढ्याची दहशतवादाशी सांगड घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर जगात आता कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, असा दावाही पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

सीमापार दहशतवादाचा संदर्भ असला तरी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर खरे तर भारत पाकिस्तानचा थेट नामोल्लेख टाळत असतो. परंतु अल्वी यांच्यानंतर केलेल्या भाषणात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानाचा स्पष्ट उल्लेख करून आपला हा शेजारी देश हल्लीच्या काळातील दहशतवादाचे केंद्रबिंदू झाला असल्याचे ठामपणे नमूद केले.

दहशतवाद हा केवळ आंतरराष्ट्रीय शांततेला व सुरक्षेला असलेला मोठा धोकाच नाही तर तो ‘नाम’ चळवळीच्या सिद्धांतांनाही हरताळ फासणारा आहे, यावर भर देऊन नायडू यांनी पाकिस्तानने शेजारी देशांच्या विरोधात सीमापार दहशतवादाला खेतपाणी घालण्याच्या आपल्या जुनाट धारणाचे अजूनही समर्थन करावे, याविषयी खंद व्यक्त केला. दहशतवादाचा भस्मासूर नेस्तनाबूत करण्याची गरजनायडू असेही म्हणाले की, ‘नाम’ चळवळीतील आपले सर्व देश आपापली विकासाची उद्दिष्टे व आकांक्षांच्या पूर्ततेवर लक्ष केंद्रित करीत असताना पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास संपादन करण्यासाठी बरेच काही करण्याची गरज आहे. पाकिस्तानने स्वत:च्या, शेजारी देशांच्या व एकूणच जगाच्या भल्यासाठी दहशतवादाला निर्धाराने सोडचिठ्ठी देणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला.माहिती तंत्रज्ञानाच्या सर्वदूर प्रसारामुळे दहशतवाद्यांना सायबर हल्ल्यांचीही क्षमता प्राप्त झाली आहे, याकडे लक्ष वेधून उपराष्ट्रपतींनी सांगितले की, दहशतवादी विचार आणि कृतींचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवादाचा हा भस्मासूर नेस्तनाबूत करण्यासाठी त्याविरुद्धचे सर्व आंतरराष्ट्रीय कायदे व यंत्रणा अधिक कडक करून त्यांची नेटाने अंमलबजावणी करणे हाच एकमेव मार्ग आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान