शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 21:32 IST

India Pakistan Relations: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली.

Nawaz Sharif On India-Pakistan Relations : मागील काही वर्षंपासून भारत आणि पाकिस्तानमधील सर्वप्रकारचे संपुष्टात आले आहेत. पण, गरिबीने त्रस्त झालेल्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी आशा आहे. पाकिस्तानने अनेकदा दोन्ही देशांमधील व्यापारीक संबंध पुर्ववत करण्याची विनंती केली आहे, मात्र भारताकडून त्याला कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. अशातच, SCO शिखर परिषदेसाठी पाकिस्तानात गेलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीनंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारत-पाक संबंधापर महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

नवाझ शरीफ यांनी गुरुवारी (17 ऑक्टोबर) पाकिस्तानात भारतीय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जयशंकर यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी ही तर सुरुवात असल्याचे म्हटले. तसेच, भारत आणि पाकिस्तान भूतकाळ सोडून भविष्याचा विचार करतील अशी आशा व्यक्त केली. नवाझ शरीफ म्हणाले, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानात यावे, अशी आमची इच्छा होती. पण, त्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पाठवले, त्याचाही आम्हाला आनंद आहे. आता कुठे नवी सुरुवात झाली आहे.

भूतकाळात डोकावू नका, भविष्याकडे वाटचाल करा. भूतकाळात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्या व्हायला नको होत्या. भविष्यात अनेक शक्यता आहेत, त्याकडे पाहिले पाहिजे. जिथे संबंध थांबले होते, तिथूनच पुन्हा सुरू करण्याची आमची इच्छा आहे. आपण आता भूतकाळ सोडून भविष्याकडे पाहिले पाहिजे. आम्हाला आता सकारात्मक पावले उचलायची आहेत, एक नवीन सुरुवात करायची आहे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

शरीफ पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आता व्यापार, हवामान बदल, व्यवसाय, उद्योग, क्रीडा इत्यादी क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. 75 वर्षे अशीच वाया गेली, आता आणखी 75 वर्षे वाया घालवायचे नाही. क्रिकेटमधील भूतकाळातील चुकांमधून धडा घेतला पाहिजे. भारताने चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी आपला संघ पाठवावा. एकमेकांचे संघ एकमेकांच्या देशात न पाठवून काय मिळणार? भारतीय संघाने पाकिस्तानात यावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. आपली (भारत-पाकिस्तान) संस्कृती, परंपरा, भाषा, खाद्यपदार्थ समान आहेत. आपल्या नेत्यांचे संबंध चांगले नसतील, पण देशातील लोकांचे नाते खूप चांगले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत