शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 21:32 IST

India Pakistan Relations: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली.

Nawaz Sharif On India-Pakistan Relations : मागील काही वर्षंपासून भारत आणि पाकिस्तानमधील सर्वप्रकारचे संपुष्टात आले आहेत. पण, गरिबीने त्रस्त झालेल्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी आशा आहे. पाकिस्तानने अनेकदा दोन्ही देशांमधील व्यापारीक संबंध पुर्ववत करण्याची विनंती केली आहे, मात्र भारताकडून त्याला कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. अशातच, SCO शिखर परिषदेसाठी पाकिस्तानात गेलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीनंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारत-पाक संबंधापर महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

नवाझ शरीफ यांनी गुरुवारी (17 ऑक्टोबर) पाकिस्तानात भारतीय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जयशंकर यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी ही तर सुरुवात असल्याचे म्हटले. तसेच, भारत आणि पाकिस्तान भूतकाळ सोडून भविष्याचा विचार करतील अशी आशा व्यक्त केली. नवाझ शरीफ म्हणाले, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानात यावे, अशी आमची इच्छा होती. पण, त्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पाठवले, त्याचाही आम्हाला आनंद आहे. आता कुठे नवी सुरुवात झाली आहे.

भूतकाळात डोकावू नका, भविष्याकडे वाटचाल करा. भूतकाळात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्या व्हायला नको होत्या. भविष्यात अनेक शक्यता आहेत, त्याकडे पाहिले पाहिजे. जिथे संबंध थांबले होते, तिथूनच पुन्हा सुरू करण्याची आमची इच्छा आहे. आपण आता भूतकाळ सोडून भविष्याकडे पाहिले पाहिजे. आम्हाला आता सकारात्मक पावले उचलायची आहेत, एक नवीन सुरुवात करायची आहे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

शरीफ पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आता व्यापार, हवामान बदल, व्यवसाय, उद्योग, क्रीडा इत्यादी क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. 75 वर्षे अशीच वाया गेली, आता आणखी 75 वर्षे वाया घालवायचे नाही. क्रिकेटमधील भूतकाळातील चुकांमधून धडा घेतला पाहिजे. भारताने चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी आपला संघ पाठवावा. एकमेकांचे संघ एकमेकांच्या देशात न पाठवून काय मिळणार? भारतीय संघाने पाकिस्तानात यावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. आपली (भारत-पाकिस्तान) संस्कृती, परंपरा, भाषा, खाद्यपदार्थ समान आहेत. आपल्या नेत्यांचे संबंध चांगले नसतील, पण देशातील लोकांचे नाते खूप चांगले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत