शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

India Pakistan News: "भारतातून पाकिस्तानात येऊन आजोबांनी चूक केली..," व्यक्त केलं दु:ख; एकानं फडकवला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 20:13 IST

ज्यांच्या पूर्वीच्या पिढीनं फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निवड केली त्यांचे काही वंशज आता त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. यानंतर काही जणांनी भारतातूनपाकिस्तानात जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, तर काही लोक भारतातच राहिले. फाळणीच्या सात दशकांनंतर आता दोन्ही देशांची कहाणी वेगळी आहे. एक देश आपल्या प्रगतीच्या जोरावर जगात आपलं सर्वोच्च स्थान निर्माण करत आहे. तर दुसऱ्या देशात आर्थिक दिवाळखोरीचा धोका तर कधी सत्तापालटाची भीती. 

अशा परिस्थितीत ज्यांच्या पूर्वीच्या पिढीनं फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निवड केली त्यांचे काही वंशज आता त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. असाच एक व्यक्ती म्हणजे सयान अली. सायन अली अमेरिकेत राहतो आणि मूळचा पाकिस्तानी आहे. इतकंच नाही तर अनेकदा भारताची स्तुती करताना व्हिडीओ शेअर करतो. यापूर्वी पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमीनेही आपल्या आजोबांनी भारत सोडण्यावर प्रतिक्रिया देत 'दादाजी ने वाट लगा दी' असं लिहिलं होतं.

सयाननं आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. तिरंग्यासोबत असलेल्या त्याच्या या फोटोला अनेक लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत. त्यानं यासोबत एक पोस्टही शेअर केलीये. “पाकिस्तान अशी जगात कोणती जागा नाही. जगाला याची गरज होती म्हणून नाही, तर धर्माच्या आधारे पाकिस्तानची स्थापना करण्यात आली होती. माझ्या आजी आजोबांनी भारताशिवाय पाकिस्तानची निवड केली कारण ते मुस्लिम होते. पाकिस्तानात जाणं माझ्या आजी आजोबांची सर्वात मोठी चूक होती,” असं त्यानं लिहिलंय.

भारतात असतो तर…

“जर मी पाकिस्तान ऐवजी भारतात असतो, तर सुरक्षेच्या कारणास्तव मला देश सोडवा लागला नसता, हिंदु मुस्लीम कधी शत्रू नव्हते. काही समाजकंटक त्यांना वेगळं करू पाहत होते. बाहेरच्या शक्ती अखंड भारताला पाहून घाबरल्या. दुर्देवानं त्या सुंदर आणि कदाचित सर्वात शक्तिवान देशाला विभाजीत करण्यात यशस्वी ठरल्या,” असंही सयान म्हणाला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत