शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

India Pakistan News: "भारतातून पाकिस्तानात येऊन आजोबांनी चूक केली..," व्यक्त केलं दु:ख; एकानं फडकवला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 20:13 IST

ज्यांच्या पूर्वीच्या पिढीनं फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निवड केली त्यांचे काही वंशज आता त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. यानंतर काही जणांनी भारतातूनपाकिस्तानात जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, तर काही लोक भारतातच राहिले. फाळणीच्या सात दशकांनंतर आता दोन्ही देशांची कहाणी वेगळी आहे. एक देश आपल्या प्रगतीच्या जोरावर जगात आपलं सर्वोच्च स्थान निर्माण करत आहे. तर दुसऱ्या देशात आर्थिक दिवाळखोरीचा धोका तर कधी सत्तापालटाची भीती. 

अशा परिस्थितीत ज्यांच्या पूर्वीच्या पिढीनं फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निवड केली त्यांचे काही वंशज आता त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. असाच एक व्यक्ती म्हणजे सयान अली. सायन अली अमेरिकेत राहतो आणि मूळचा पाकिस्तानी आहे. इतकंच नाही तर अनेकदा भारताची स्तुती करताना व्हिडीओ शेअर करतो. यापूर्वी पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमीनेही आपल्या आजोबांनी भारत सोडण्यावर प्रतिक्रिया देत 'दादाजी ने वाट लगा दी' असं लिहिलं होतं.

सयाननं आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. तिरंग्यासोबत असलेल्या त्याच्या या फोटोला अनेक लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत. त्यानं यासोबत एक पोस्टही शेअर केलीये. “पाकिस्तान अशी जगात कोणती जागा नाही. जगाला याची गरज होती म्हणून नाही, तर धर्माच्या आधारे पाकिस्तानची स्थापना करण्यात आली होती. माझ्या आजी आजोबांनी भारताशिवाय पाकिस्तानची निवड केली कारण ते मुस्लिम होते. पाकिस्तानात जाणं माझ्या आजी आजोबांची सर्वात मोठी चूक होती,” असं त्यानं लिहिलंय.

भारतात असतो तर…

“जर मी पाकिस्तान ऐवजी भारतात असतो, तर सुरक्षेच्या कारणास्तव मला देश सोडवा लागला नसता, हिंदु मुस्लीम कधी शत्रू नव्हते. काही समाजकंटक त्यांना वेगळं करू पाहत होते. बाहेरच्या शक्ती अखंड भारताला पाहून घाबरल्या. दुर्देवानं त्या सुंदर आणि कदाचित सर्वात शक्तिवान देशाला विभाजीत करण्यात यशस्वी ठरल्या,” असंही सयान म्हणाला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत