शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

सर्व प्रश्नांवर भारत-पाक चर्चा होणे गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 03:44 IST

पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्याचवेळी त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत चिंता व्यक्त केली. येत्या काही दिवसात इस्लामाबाद येथे होत अससेल्या सार्क देशांच्या परिषदेत भारतानेही सहभागी व्हावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताचे पाकिस्तानातील राजदूत अजय बसारिया यांनी शुक्रवारी इम्रान खान यांची सदिच्छा भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी बसारिया म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दूरध्वनी करून इम्रान खान यांचे अभिनंदन केले होते. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मक दिशेने पुढे जातील, अशी आशा भारतात निर्माण झाली आहे.३० जुलै रोजी मोदी यांनी इम्रान खान यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पाकसोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा निसंदिग्ध शब्दात बोलून दाखविली होती. संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी पुढे येत संयुक्त धोरण आखले पाहिजे, असे त्यावेळी मोदी म्हणाले होते.त्यावेळी इम्रान खान यांनी दोन्ही देशांनी संवादातून वादांवर तोडगा काढला पाहिजे, असे मत नोंदवले होते. दोन्ही देशांनी एकत्र येत लाखो नागरिकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले पाहिजे, असेही इम्रान खान म्हणाले होते. (वृत्तसंस्था)>भारताचे पाकिस्तानातील राजदूत अजय बसारिया यांनी शुक्रवारी इम्रान खान यांची सदिच्छा भेट घेत भारतीय क्रिकेटपटंूच्या स्वाक्षऱ्या असलेली एक बॅट खान यांना भेट म्हणून दिली.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान