शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रश्नांवर भारत-पाक चर्चा होणे गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 03:44 IST

पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्याचवेळी त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत चिंता व्यक्त केली. येत्या काही दिवसात इस्लामाबाद येथे होत अससेल्या सार्क देशांच्या परिषदेत भारतानेही सहभागी व्हावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताचे पाकिस्तानातील राजदूत अजय बसारिया यांनी शुक्रवारी इम्रान खान यांची सदिच्छा भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी बसारिया म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दूरध्वनी करून इम्रान खान यांचे अभिनंदन केले होते. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मक दिशेने पुढे जातील, अशी आशा भारतात निर्माण झाली आहे.३० जुलै रोजी मोदी यांनी इम्रान खान यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पाकसोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा निसंदिग्ध शब्दात बोलून दाखविली होती. संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी पुढे येत संयुक्त धोरण आखले पाहिजे, असे त्यावेळी मोदी म्हणाले होते.त्यावेळी इम्रान खान यांनी दोन्ही देशांनी संवादातून वादांवर तोडगा काढला पाहिजे, असे मत नोंदवले होते. दोन्ही देशांनी एकत्र येत लाखो नागरिकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले पाहिजे, असेही इम्रान खान म्हणाले होते. (वृत्तसंस्था)>भारताचे पाकिस्तानातील राजदूत अजय बसारिया यांनी शुक्रवारी इम्रान खान यांची सदिच्छा भेट घेत भारतीय क्रिकेटपटंूच्या स्वाक्षऱ्या असलेली एक बॅट खान यांना भेट म्हणून दिली.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान