शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘’भारताने CEPC उद्ध्वस्त करण्यासाठी ८० अब्ज दिले, रॉ ने ७०० दहशतवादी तयार केले’’

By बाळकृष्ण परब | Updated: November 14, 2020 16:33 IST

India-Pakistan LOC News : ऐन दिवाळीत पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून वातावरण बिघडवले आहे. या तणावाच्या परिस्थितीदरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्या्ंनी भारतावर मोठा आरोप केला आहे.

ठळक मुद्देबलुचिस्तानमध्ये भारत दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी आणि लष्कराच्या प्रवक्त्याने केला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार रॉ ने चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CEPC) उद्ध्वस्त करण्यासाठी तब्बल ८ हजार कोटी रुपये दिलेभारताने ७०० जणांची एक संघटना बनवली आहे. ही संघटना बलुचिस्तानमध्ये सीपीईसी ला लक्ष्य करत राहील

इस्लामाबाद - ऐन दिवाळीत पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून वातावरण बिघडवले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या आगळीकीत भारताच्या काही जवानांना वीरमरण आले आहे. तसेच काही सर्वसामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तरदाखल चोख उत्तर दिले असून, यात पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. दरम्यान, या तणावाच्या परिस्थितीदरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्या्ंनी भारतावर मोठा आरोप केला आहे. बलुचिस्तानमध्ये भारत दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी आणि लष्कराच्या प्रवक्त्याने केला आहे.आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार भारतीय गुप्तहेर यंत्रणा रॉ ने चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CEPC) उद्ध्वस्त करण्यासाठी तब्बल ८ हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच भारताने ७०० जणांची एक संघटना बनवली आहे. ही संघटना बलुचिस्तानमध्ये सीपीईसी ला लक्ष्य करत राहील. भारताने गिलगिट बाल्टिस्थानमधील निवडणुकांपूर्वीच तिथे राष्ट्रवादाचा भडका उडवण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीनंतरही भारताचा इरादा चांगला दिसत नाही आहे.

दरम्यान , पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील उरी विभागापासून गुरेजपर्यंत अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता. यामध्या पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर भारताच्या प्रत्युत्तर गोळीबारात पाकिस्तानचे आठ जवान ठार झाले आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराने एलओसीवर पाकिस्तानचे हत्यारांचे साठे, इंधनाचे साठे आणि दहशतवाद्यांचे लाँच पॅड नष्ट केले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीIndiaभारत