शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:28 IST

india out from worlds powerful country list: भारताचे गुण कमी झाल्यानं यादीतून बाहेर

मुंबई: चालू वर्षातील सामर्थ्यशाली देशांची यादी जाहीर झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. मात्र भारत या यादीतून बाहेर पडला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारताचे दोन गुण कमी झाले आहेत. सिडनीतल्या लोवी इन्स्टिट्यूनं या संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.लोवी इन्स्टिट्यूच्या आशिया पॉवर इंडेक्सनुसार २०१९ मध्ये भारताला ४१ गुण होते. त्यात आता घट झाली आहे. यंदा भारताला ३९.७ गुण मिळाले आहेत. ४० किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या देशांनाच सामर्थ्यशाली देशांच्या यादीत स्थान मिळतं. मात्र यंदा या यादीतील भारताचा समावेश अवघ्या काही गुणांमुळे थोडक्यात हुकला आहे. आशियातला दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता मध्य सामर्थ्यशाली देशांच्या यादीत झाल्याचं लोवी इन्स्टिट्यूटनं अहवालात म्हटलं आहे. 'येत्या काही वर्षांमध्ये भारताचा समावेश पुन्हा सामर्थ्यशाली देशांच्या यादीत होऊ शकेल. इंडो पॅसिफिक क्षेत्रात येणारा भारत कोरोनामुळे आपली विकासाची क्षमता हरवून बसला आहे,' असं लोवी इन्स्टिट्यूनं अहवालात नमूद केलं आहे.चीनच्या तुलनेत भारत पिछाडीवर'भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास समान आहे. काही वर्षांनी भारत लोकसंख्येत चीनला मागे टाकू शकेल. पण कोरोना संकटामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत, चीनचे एकूण आर्थिक उत्पादन केवळ ४० टक्क्यांपर्यंत पोहोचेल,' असं लोवी इन्स्टिट्यूनं अहवालात म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीन