शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत मदत करणार? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:49 IST

pakistan economic crisis: मागिल काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहेत.

Pakistan Economic Crisis: मागिल काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये डाळ, पीठ, तेल, गॅस यासारख्या वस्तुंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटावरुन आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पाकिस्तानचे भविष्य मुख्यत्वे त्यांच्या स्वतःच्या कृती आणि निवडींवर निश्चित केले जाईल.' आर्थिक संकटातून कसे बाहेर पडायचे हे पाकिस्तानवर अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्री एस जय शंकर यांनी दिली. 

भारताने श्रीलंकेला दिलेल्या मदतीचा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, गंभीर आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला मदत केली. पण भारत आणि श्रीलंकेचे संबंध पाकिस्तानपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.

परकीय चलनाची घटता साठा, उच्च चलनवाढीचा दर आणि पाकिस्तानी चलनात मोठी घसरण यामुळे पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यावर मात करण्यासाठी, पाकिस्तान आयएमएफकडून बेलआउट पॅकेज मिळविण्यासाठी उच्च कर दर लागू करण्यास तयार आहे. मुलाखतीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, "कोणीही अचानक आणि अनावश्यकपणे स्वतःला कठीण परिस्थितीत सापडत नाही. आज आमचे पाकिस्तानशी असे संबंध नाहीत की आम्ही त्या मदतीत थेट सहभागी आहोत. "यावर मात करण्याचा मार्ग शोधणे हे आपल्या शेजारील देशावर अवलंबून आहे."

'मला वाटते की पाकिस्तानचे भवितव्य मुख्यत्वे पाकिस्तानच्या कृती आणि निवडींवर ठरते. पाकिस्तानची श्रीलंकेशी तुलना करण्यास नकार देताना ते म्हणाले की, भारताचे दोन्ही देशांसोबतचे संबंध पूर्णपणे भिन्न आहेत. भारताचे श्रीलंकेशी वेगळे संबंध आहेत. 

Turkey Earthquake: तुर्की पुन्हा भूकंपाने हादरलं; तीव्रता ६.४ रिश्टर स्केल, काही इमारती जमीनदोस्त

यावेळी जयशंकर यांनी भारतीय लोकांच्या श्रीलंका आणि पाकिस्तानबद्दलच्या भावनांचाही उल्लेख केला. पाकिस्तान भारतात सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम झाला आहे, असंही जयशंकर म्हणाले.

'भारत आपल्या शेजाऱ्यांना कठीण परिस्थितीत मदत करण्यास सदैव तयार आहे.जर मी श्रीलंकेशी तुलना केली तर ते खूप वेगळे नाते आहे. श्रीलंकेबद्दल भारतात अजूनही खूप सहानुभूती आहे. शेजार्‍यांच्या चिंता ही भारताची चिंता असणे स्वाभाविक आहे आणि आपण त्यांना सामोरे जाण्यास मदत केली पाहिजे. पण, पाकिस्तानबाबत देशातील जनतेच्या भावना काय आहेत, हेही तुम्हाला माहीत आहे, असंही जयशंकर म्हणाले.  (Pakistan Economic Crisis)

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBJPभाजपाSri Lankaश्रीलंका