शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत मदत करणार? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:49 IST

pakistan economic crisis: मागिल काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहेत.

Pakistan Economic Crisis: मागिल काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये डाळ, पीठ, तेल, गॅस यासारख्या वस्तुंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटावरुन आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पाकिस्तानचे भविष्य मुख्यत्वे त्यांच्या स्वतःच्या कृती आणि निवडींवर निश्चित केले जाईल.' आर्थिक संकटातून कसे बाहेर पडायचे हे पाकिस्तानवर अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्री एस जय शंकर यांनी दिली. 

भारताने श्रीलंकेला दिलेल्या मदतीचा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, गंभीर आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला मदत केली. पण भारत आणि श्रीलंकेचे संबंध पाकिस्तानपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.

परकीय चलनाची घटता साठा, उच्च चलनवाढीचा दर आणि पाकिस्तानी चलनात मोठी घसरण यामुळे पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यावर मात करण्यासाठी, पाकिस्तान आयएमएफकडून बेलआउट पॅकेज मिळविण्यासाठी उच्च कर दर लागू करण्यास तयार आहे. मुलाखतीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, "कोणीही अचानक आणि अनावश्यकपणे स्वतःला कठीण परिस्थितीत सापडत नाही. आज आमचे पाकिस्तानशी असे संबंध नाहीत की आम्ही त्या मदतीत थेट सहभागी आहोत. "यावर मात करण्याचा मार्ग शोधणे हे आपल्या शेजारील देशावर अवलंबून आहे."

'मला वाटते की पाकिस्तानचे भवितव्य मुख्यत्वे पाकिस्तानच्या कृती आणि निवडींवर ठरते. पाकिस्तानची श्रीलंकेशी तुलना करण्यास नकार देताना ते म्हणाले की, भारताचे दोन्ही देशांसोबतचे संबंध पूर्णपणे भिन्न आहेत. भारताचे श्रीलंकेशी वेगळे संबंध आहेत. 

Turkey Earthquake: तुर्की पुन्हा भूकंपाने हादरलं; तीव्रता ६.४ रिश्टर स्केल, काही इमारती जमीनदोस्त

यावेळी जयशंकर यांनी भारतीय लोकांच्या श्रीलंका आणि पाकिस्तानबद्दलच्या भावनांचाही उल्लेख केला. पाकिस्तान भारतात सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम झाला आहे, असंही जयशंकर म्हणाले.

'भारत आपल्या शेजाऱ्यांना कठीण परिस्थितीत मदत करण्यास सदैव तयार आहे.जर मी श्रीलंकेशी तुलना केली तर ते खूप वेगळे नाते आहे. श्रीलंकेबद्दल भारतात अजूनही खूप सहानुभूती आहे. शेजार्‍यांच्या चिंता ही भारताची चिंता असणे स्वाभाविक आहे आणि आपण त्यांना सामोरे जाण्यास मदत केली पाहिजे. पण, पाकिस्तानबाबत देशातील जनतेच्या भावना काय आहेत, हेही तुम्हाला माहीत आहे, असंही जयशंकर म्हणाले.  (Pakistan Economic Crisis)

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBJPभाजपाSri Lankaश्रीलंका