शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 20:52 IST

चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.

India-Maldives: गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला भारत आणि मालदीवमधला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. यातच आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पुन्हा एकदा भारताला आपले सैन्य मालदीवमधून हटवण्यासाठी इशारा दिला असून, भारताला 15 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, मुइज्जू शनिवारीच चीन दौऱ्यावरुन परत आले आणि भारताला हा इशारा दिला आहे. चीन दौऱ्यात मुइझू यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या विनंतीवरुन ही तुकडी तेथे तैनात करण्यात आली होती. भारतीय लष्कराची ही तुकडी मालदीवच्या लष्कराला सागरी सुरक्षा तसेच आपत्ती निवारण कार्यात मदत करते, परंतु आता मुइझ्झूच्या सरकारने भारतीय लष्कराच्या तुकडीला 15 मार्चपर्यंत मालदीव सोडण्याचे आदेश दिले आहेत.

तुकडीमध्ये 88 सैनिकांचा समावेश मालदीवचे सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी म्हटले की, भारतीय सैन्य यापुढे देशात राहू शकत नाहीत. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांच्या सरकारचे हे धोरण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवमध्ये भारतीय लष्कराचे 88 सैनिक उपस्थित आहेत. मुइज्जू सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले होते, परंतु आता त्यांनी यासाठी मुदतही निश्चित केली आहे.

मुइज्जू भारताचे विरोधकदोन महिन्यांपूर्वी मुइझ्झू म्हणाले होते की, मालदीवला आपल्या भूमीवर परदेशी सैन्याची उपस्थिती चालणार नाही. मुइझू हे चीनच्या जवळचे मानले जातात आणि त्यांच्या 'इंडिया आऊट' मोहिमेतूनच त्यांना मालदीवमध्ये सत्ता मिळाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपपदाच्या निवडणुकीदरम्यान मुइज्जूने भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयIndian Armyभारतीय जवानchinaचीन