शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:24 IST

हिंदूंवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशने भारत अल्पसंख्यांकाबाबत दुहेरी भूमिका घेत असल्याचे म्हटलं आहे.

Bangladesh on Hindu Attack:बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहेत. अद्यापही हिंदू मंदिरांवर हल्ले सुरु असून बांगलादेश सरकारने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरीकडे बांग्लादेश मात्र फुशारक्या मारण्यात व्यस्त आहे. भारत अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेबाबत दुहेरी भूमिका घेत असल्याचा दावा बांगलादेशने शुक्रवारी केला आहे. तसेच भारतीय माध्यमे आमच्याविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात चुकीची प्रचार मोहीम चालवत असल्याचाही आरोपही बांगलादेशने केला.

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि इस्कॉनवर बंदी घालण्याच्या मागणीचा वाद आणखी वाढत चालला आहे. हिंदूंवरील हल्ल्यांबाबत बांगलादेशने उद्दामपणा दाखवला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे प्रेस सेक्रेटरी शफीकुल इस्लाम यांनी परिस्थितीवर स्पष्टीकरण देताना बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित असल्याचे म्हटलं आहे. तसेच इस्कॉनवर बंदी घालण्याचा कोणताही हेतू नाही. अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबत भारत दुटप्पी मापदंड अवलंबत असल्याचे शफीकुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. या विधाननंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे कायदेशीर बाबी सल्लागार आसिफ नजरुल यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये बांगलादेशबद्दल भारताची अवास्तव चिंता कायम असल्याचे म्हटलं. "अल्पसंख्याक मुस्लीम समाजावर अत्याचाराच्या अगणित घटना भारतात घडत राहतात पण त्यांना कसलाही पश्चाताप किंवा लाज नाही. भारताचा हा दुटप्पीपणा निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. बहुतेक बांगलादेशींना (६४.१ टक्के) असा विश्वास आहे की हे अंतरिम सरकार पूर्वीच्या अवामी लीग सरकारइतकेच चांगले असेल. ते देशातील अल्पसंख्याक समुदायांना अधिक चांगली सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे," असं आसिफ नजरुल यांनी म्हटलं.

हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशातील वातावण आणखीनच तापलं  आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. चट्टोग्राम न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. शफीकुल इस्लाम म्हणाले की, "दास यांना निष्पक्षपणे बाजू मांडण्यासाठी संधी मिळेल. बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाचे लोक सुरक्षित आहेत. अफवांवर लक्ष देऊ नका."

चिन्मय दास यांच्या अटकेनंतर इस्कॉनवर बंदीदेखील घालण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, बांगलादेश उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. शफीकुल इस्लाम यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं. इस्कॉनवर बंदी घालण्याची कोणतीही योजना नाही. ही केवळ अफवा आहे. सरकार प्रत्येक समुदायाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं शफीकुल इस्लाम यांनी म्हटलं. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतHinduहिंदू