शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
3
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
4
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
5
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
6
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
7
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
8
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
9
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
10
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
11
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
12
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
13
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
14
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
15
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
16
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
17
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
18
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
19
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
20
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन

"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:24 IST

हिंदूंवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशने भारत अल्पसंख्यांकाबाबत दुहेरी भूमिका घेत असल्याचे म्हटलं आहे.

Bangladesh on Hindu Attack:बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहेत. अद्यापही हिंदू मंदिरांवर हल्ले सुरु असून बांगलादेश सरकारने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरीकडे बांग्लादेश मात्र फुशारक्या मारण्यात व्यस्त आहे. भारत अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेबाबत दुहेरी भूमिका घेत असल्याचा दावा बांगलादेशने शुक्रवारी केला आहे. तसेच भारतीय माध्यमे आमच्याविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात चुकीची प्रचार मोहीम चालवत असल्याचाही आरोपही बांगलादेशने केला.

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि इस्कॉनवर बंदी घालण्याच्या मागणीचा वाद आणखी वाढत चालला आहे. हिंदूंवरील हल्ल्यांबाबत बांगलादेशने उद्दामपणा दाखवला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे प्रेस सेक्रेटरी शफीकुल इस्लाम यांनी परिस्थितीवर स्पष्टीकरण देताना बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित असल्याचे म्हटलं आहे. तसेच इस्कॉनवर बंदी घालण्याचा कोणताही हेतू नाही. अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबत भारत दुटप्पी मापदंड अवलंबत असल्याचे शफीकुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. या विधाननंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे कायदेशीर बाबी सल्लागार आसिफ नजरुल यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये बांगलादेशबद्दल भारताची अवास्तव चिंता कायम असल्याचे म्हटलं. "अल्पसंख्याक मुस्लीम समाजावर अत्याचाराच्या अगणित घटना भारतात घडत राहतात पण त्यांना कसलाही पश्चाताप किंवा लाज नाही. भारताचा हा दुटप्पीपणा निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. बहुतेक बांगलादेशींना (६४.१ टक्के) असा विश्वास आहे की हे अंतरिम सरकार पूर्वीच्या अवामी लीग सरकारइतकेच चांगले असेल. ते देशातील अल्पसंख्याक समुदायांना अधिक चांगली सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे," असं आसिफ नजरुल यांनी म्हटलं.

हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशातील वातावण आणखीनच तापलं  आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. चट्टोग्राम न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. शफीकुल इस्लाम म्हणाले की, "दास यांना निष्पक्षपणे बाजू मांडण्यासाठी संधी मिळेल. बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाचे लोक सुरक्षित आहेत. अफवांवर लक्ष देऊ नका."

चिन्मय दास यांच्या अटकेनंतर इस्कॉनवर बंदीदेखील घालण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, बांगलादेश उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. शफीकुल इस्लाम यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं. इस्कॉनवर बंदी घालण्याची कोणतीही योजना नाही. ही केवळ अफवा आहे. सरकार प्रत्येक समुदायाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं शफीकुल इस्लाम यांनी म्हटलं. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतHinduहिंदू