शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

खलिस्तान 'स्वतंत्र' करु पाहाणाऱ्या हालचालींवर भारताने नोंदवला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 15:58 IST

भारताने याबाबत इंग्लंड सरकारकडे आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्ली- इंग्लंडमधील एका गटाने भारतामध्ये असंतोष पसरेल अशा प्रकारची कृती सुरु केली आहे. या गटाने इंग्लंडमध्ये खलिस्तानवर सार्वमत घेण्यासाठी प्रयत्न चालवले असून 'स्वतंत्र पंजाबसाठी' सार्वमतातून पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली सुरु केली आहे.

सिख फॉर जस्टीस असे या गटाचे नाव असून 12 ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअर येथे एक जागतिक रॅली आयोजित करण्यासाठी या गटाने हालचाली सुरु केल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ,'' याबाबत आपल्याकडे माहिती आली असून हे प्रकरण आम्ही इंग्लंड सरकारच्या समोर ठेवले असून आम्ही राजकीय पावलेही उचलणार आहोत'' अशी माहिती दिली आहे. द्वेष पसरवणाऱ्या अशा कोणत्याही गटाला परवानगी देऊन इंग्लंड सरकार द्वीपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ देणार नाही अशी आम्हाला आशा आहे अशा स्पष्ट शब्दांमध्ये रवीश कुमार यांनी बाजू मांडली आहे. इंग्लंड आणि इतर परदेशांमध्ये राहाणाऱ्या शीख लोकांपैकी बहुतांश शीख हे भारताच्या बाजूने विचार करणारे आहेत. मात्र काही लहानसे गट अशांतता पसरवण्याचे काम करत आहेत असेही रवीश कुमार यांनी सांगितले आहे.सिख फॉर जस्टीसच्या रॅलीमध्ये 2020 साली शीखांचे सार्वमत घेण्याबद्दल विचार होणार आहे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे. भारतातील शीखांनाही यामध्ये सहभाग घेता येईल असे या संघटनेने म्हटले आहे.80 च्या दशकातील खलिस्तानची चळवळ भारतातून नष्ट करण्यात आली असली तरी इंग्लंड, कॅनडासारख्या देशांमध्ये काही मोजक्या लोकांनी खलिस्तान प्रश्नाचा निखारा जपून कायम धगधगत ठेवला आहे. यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या परस्परसंबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे.