शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:08 IST

Indian soldiers withdrawn from Maldives: आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली. मात्र दिलेल्या माहितीत जवानांचा नेमका आकडा सांगण्यात आलेला नाही.

Indian soldiers withdrawn from Maldives: भारतीय लष्करी जवानांच्या माघारीसाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (President Mohamed Muizzu) यांनी भारताला 10 मे या तारखेची मुदत दिली होती. त्यानुसार भारताने मालदीवमधून आपले सर्व सैनिक माघारी बोलवून घेतले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. राष्ट्रपती कार्यालयाच्या मुख्य प्रवक्त्या हीना वालीद यांनी Sun.mv न्यूज पोर्टलला सांगितले की, आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली आहे. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीत जवानांचा एकूण आकडा नमूद करण्यात आलेला नाही. तैनात असलेल्या सैनिकांच्या संख्येबद्दलचा तपशील नंतर उघड केला जाईल असे त्या म्हणाल्या.

भारत आणि मालदीवमध्ये सुमारे 6 महिन्यांच्या तणावानंतर मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर संबंध सुधारण्यासाठी भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान भारतीय जवानांची शेवटची तुकडी भारतात परत पाठवण्यात आली. मोहम्मद मुइज्जू यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मालदीवच्या भूमीवरील भारतीय लष्कराची तैनाती संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते. मालदीवमधून भारतीय सैन्याच्या पूर्ण माघारीसाठी 10 मे पर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर आज भारताचे सर्व सैनिक मायदेशी परतले.

मालदीवमध्ये भारतीय सैनिक का तैनात करण्यात आले?

भारताने भेट दिलेली दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमाने चालवण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये तैनात करण्यात आले होते. चीनच्या पाठिंब्याचे सरकार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मालदीवच्या नव्या मुईज्जू सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात भारतीय सैन्य तैनात करण्यास विरोध दर्शवला होता आणि त्यांना परत पाठवण्याचे आदेश जारी केले होते. यापूर्वी, मालदीव सरकारने सोमवारी 51 सैनिकांना भारतात परत पाठवल्याची घोषणा केली होती. तर सरकारने अधिकृत कागदपत्रांचा हवाला देत मालदीवमध्ये 89 भारतीय सैनिकांची उपस्थिती असल्याची माहिती दिली होती.

टॅग्स :MaldivesमालदीवIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकchinaचीन