शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:08 IST

Indian soldiers withdrawn from Maldives: आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली. मात्र दिलेल्या माहितीत जवानांचा नेमका आकडा सांगण्यात आलेला नाही.

Indian soldiers withdrawn from Maldives: भारतीय लष्करी जवानांच्या माघारीसाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (President Mohamed Muizzu) यांनी भारताला 10 मे या तारखेची मुदत दिली होती. त्यानुसार भारताने मालदीवमधून आपले सर्व सैनिक माघारी बोलवून घेतले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. राष्ट्रपती कार्यालयाच्या मुख्य प्रवक्त्या हीना वालीद यांनी Sun.mv न्यूज पोर्टलला सांगितले की, आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली आहे. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीत जवानांचा एकूण आकडा नमूद करण्यात आलेला नाही. तैनात असलेल्या सैनिकांच्या संख्येबद्दलचा तपशील नंतर उघड केला जाईल असे त्या म्हणाल्या.

भारत आणि मालदीवमध्ये सुमारे 6 महिन्यांच्या तणावानंतर मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर संबंध सुधारण्यासाठी भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान भारतीय जवानांची शेवटची तुकडी भारतात परत पाठवण्यात आली. मोहम्मद मुइज्जू यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मालदीवच्या भूमीवरील भारतीय लष्कराची तैनाती संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते. मालदीवमधून भारतीय सैन्याच्या पूर्ण माघारीसाठी 10 मे पर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर आज भारताचे सर्व सैनिक मायदेशी परतले.

मालदीवमध्ये भारतीय सैनिक का तैनात करण्यात आले?

भारताने भेट दिलेली दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमाने चालवण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये तैनात करण्यात आले होते. चीनच्या पाठिंब्याचे सरकार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मालदीवच्या नव्या मुईज्जू सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात भारतीय सैन्य तैनात करण्यास विरोध दर्शवला होता आणि त्यांना परत पाठवण्याचे आदेश जारी केले होते. यापूर्वी, मालदीव सरकारने सोमवारी 51 सैनिकांना भारतात परत पाठवल्याची घोषणा केली होती. तर सरकारने अधिकृत कागदपत्रांचा हवाला देत मालदीवमध्ये 89 भारतीय सैनिकांची उपस्थिती असल्याची माहिती दिली होती.

टॅग्स :MaldivesमालदीवIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकchinaचीन