शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:08 IST

Indian soldiers withdrawn from Maldives: आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली. मात्र दिलेल्या माहितीत जवानांचा नेमका आकडा सांगण्यात आलेला नाही.

Indian soldiers withdrawn from Maldives: भारतीय लष्करी जवानांच्या माघारीसाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (President Mohamed Muizzu) यांनी भारताला 10 मे या तारखेची मुदत दिली होती. त्यानुसार भारताने मालदीवमधून आपले सर्व सैनिक माघारी बोलवून घेतले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. राष्ट्रपती कार्यालयाच्या मुख्य प्रवक्त्या हीना वालीद यांनी Sun.mv न्यूज पोर्टलला सांगितले की, आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली आहे. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीत जवानांचा एकूण आकडा नमूद करण्यात आलेला नाही. तैनात असलेल्या सैनिकांच्या संख्येबद्दलचा तपशील नंतर उघड केला जाईल असे त्या म्हणाल्या.

भारत आणि मालदीवमध्ये सुमारे 6 महिन्यांच्या तणावानंतर मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर संबंध सुधारण्यासाठी भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान भारतीय जवानांची शेवटची तुकडी भारतात परत पाठवण्यात आली. मोहम्मद मुइज्जू यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मालदीवच्या भूमीवरील भारतीय लष्कराची तैनाती संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते. मालदीवमधून भारतीय सैन्याच्या पूर्ण माघारीसाठी 10 मे पर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर आज भारताचे सर्व सैनिक मायदेशी परतले.

मालदीवमध्ये भारतीय सैनिक का तैनात करण्यात आले?

भारताने भेट दिलेली दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमाने चालवण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये तैनात करण्यात आले होते. चीनच्या पाठिंब्याचे सरकार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मालदीवच्या नव्या मुईज्जू सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात भारतीय सैन्य तैनात करण्यास विरोध दर्शवला होता आणि त्यांना परत पाठवण्याचे आदेश जारी केले होते. यापूर्वी, मालदीव सरकारने सोमवारी 51 सैनिकांना भारतात परत पाठवल्याची घोषणा केली होती. तर सरकारने अधिकृत कागदपत्रांचा हवाला देत मालदीवमध्ये 89 भारतीय सैनिकांची उपस्थिती असल्याची माहिती दिली होती.

टॅग्स :MaldivesमालदीवIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकchinaचीन