शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:14 IST

पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे...

भारताने सिंधू नदीवर धरण बांधले तर पाकिस्तान त्यावर हल्ला करेल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. एवढेच नाही तर, एका टीव्हीला मुलाखत देताना, आक्रमकता केवळ गोळ्यांद्वारे नसते, तर पाणी अडवणे हा देखील हल्लाच आहे, असेही आसिफ यांनी म्हटले आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे. १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला आयडब्ल्यूटी (सिंधू पाणी करार) हा आजपर्यंतचा जगातील सर्वात यशस्वी जल करार मानला जातो. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्यांवर (रावी, बियास, सतलज) नियंत्रण देण्यात आले, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, झेलम, चिनाब) अधिक अधिकार मिळाला.

भारताल आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षित समर्थन मिळालेले नाही, असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना वाटते. भारताचे आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर फेटाळण्यात आले असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच, मोदी सरकारकडे आपले दावे सिद्ध करण्यासाठी कसलेही पुरावे नाहीत, असेही आसिफ यांनी म्हटले आहे. 

भारत शस्त्राप्रमाणे करतोय पाण्याचा वापर -तत्पूर्वी, भारत पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत आहे. मात्र आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. जर युद्धाची स्थिती निर्माण झालीच, तर पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल. तसेच सिंधू पाणी करारासंदर्भात पाकिस्तान जागतिक बँकेचा दरवाजा ठोठावेल, असेही ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिका -पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांच्या मृत्यू झाला होता. यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आयडब्ल्यूटी रद्द करण्यासोबतच, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द केले आहेत आणि वाघा-अटारी सीमाही बंद केली आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध