शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:14 IST

पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे...

भारताने सिंधू नदीवर धरण बांधले तर पाकिस्तान त्यावर हल्ला करेल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. एवढेच नाही तर, एका टीव्हीला मुलाखत देताना, आक्रमकता केवळ गोळ्यांद्वारे नसते, तर पाणी अडवणे हा देखील हल्लाच आहे, असेही आसिफ यांनी म्हटले आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे. १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला आयडब्ल्यूटी (सिंधू पाणी करार) हा आजपर्यंतचा जगातील सर्वात यशस्वी जल करार मानला जातो. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्यांवर (रावी, बियास, सतलज) नियंत्रण देण्यात आले, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, झेलम, चिनाब) अधिक अधिकार मिळाला.

भारताल आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षित समर्थन मिळालेले नाही, असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना वाटते. भारताचे आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर फेटाळण्यात आले असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच, मोदी सरकारकडे आपले दावे सिद्ध करण्यासाठी कसलेही पुरावे नाहीत, असेही आसिफ यांनी म्हटले आहे. 

भारत शस्त्राप्रमाणे करतोय पाण्याचा वापर -तत्पूर्वी, भारत पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत आहे. मात्र आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. जर युद्धाची स्थिती निर्माण झालीच, तर पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल. तसेच सिंधू पाणी करारासंदर्भात पाकिस्तान जागतिक बँकेचा दरवाजा ठोठावेल, असेही ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिका -पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांच्या मृत्यू झाला होता. यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आयडब्ल्यूटी रद्द करण्यासोबतच, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द केले आहेत आणि वाघा-अटारी सीमाही बंद केली आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध