शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 01:11 IST

India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना संबोधित करताना हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने आक्रमक कारवाई करत आमची शस्त्रास्त्रे आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, अशी कबुलीही शरीफ यांनी दिली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या मध्यस्तीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम जाहीर झाला. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना संबोधित करताना हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने आक्रमक कारवाई करत आमची शस्त्रास्त्रे आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, अशी कबुलीही शरीफ यांनी दिली. मात्र आता आम्हाल भारतासोबत युद्धविराम हवा असून, भारतासोबत चर्चा करण्याची आमची इच्छा आहे, असा दावाही शाहबाज शरीफ यांनी केला.

दोन तीन दिवस एकमेकांवर जोरदार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी राजी झाले होते. तसेच शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धविराम लागूही झाला. होता युद्धविराम लागू झाल्यानंत देशवासियांना संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने केलेल्या आक्रमक कारवाईत पाकिस्तानचं जबर नुकसान झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. देशवासियांना संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, भारताने आमची लष्करी हत्यारे नष्ट केली. लष्करी तळ उद्ध्वस्त केले. तसेच भारताने केलेल्या कारवाईत आमचे अनेक सैनिक आणि सर्वसामान्य लोक मारले गेले, असे शरीफ म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, आम्हाला भारतासोबत युद्ध नको आहे. आम्हाला युद्धविराम हवा आहे. दरम्यान, भारतासोबत झालेल्या युद्धविरामासाठी शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच सौदी अरेबिया, तुर्कीए आणि कतार आदी देशांच्या प्रमुखांचे आभार मानले. तसेच पाकिस्तानचा खास मित्र असा उल्लेख करत शाहबाज शरीफ यांनी चीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचेही आभार मानले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत