शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
4
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
5
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
6
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
7
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
8
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
9
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
10
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
11
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
12
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
13
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
14
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
16
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
17
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
18
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
19
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
20
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...

भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 01:11 IST

India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना संबोधित करताना हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने आक्रमक कारवाई करत आमची शस्त्रास्त्रे आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, अशी कबुलीही शरीफ यांनी दिली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या मध्यस्तीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम जाहीर झाला. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना संबोधित करताना हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने आक्रमक कारवाई करत आमची शस्त्रास्त्रे आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, अशी कबुलीही शरीफ यांनी दिली. मात्र आता आम्हाल भारतासोबत युद्धविराम हवा असून, भारतासोबत चर्चा करण्याची आमची इच्छा आहे, असा दावाही शाहबाज शरीफ यांनी केला.

दोन तीन दिवस एकमेकांवर जोरदार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी राजी झाले होते. तसेच शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धविराम लागूही झाला. होता युद्धविराम लागू झाल्यानंत देशवासियांना संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने केलेल्या आक्रमक कारवाईत पाकिस्तानचं जबर नुकसान झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. देशवासियांना संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, भारताने आमची लष्करी हत्यारे नष्ट केली. लष्करी तळ उद्ध्वस्त केले. तसेच भारताने केलेल्या कारवाईत आमचे अनेक सैनिक आणि सर्वसामान्य लोक मारले गेले, असे शरीफ म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, आम्हाला भारतासोबत युद्ध नको आहे. आम्हाला युद्धविराम हवा आहे. दरम्यान, भारतासोबत झालेल्या युद्धविरामासाठी शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच सौदी अरेबिया, तुर्कीए आणि कतार आदी देशांच्या प्रमुखांचे आभार मानले. तसेच पाकिस्तानचा खास मित्र असा उल्लेख करत शाहबाज शरीफ यांनी चीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचेही आभार मानले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत