शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

'हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन...' जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला झोंबली मिरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 14:44 IST

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सीमावादाबाबत केलेल्या एका वक्तव्याने चीनी संरक्षण तज्ञाने संताप व्यक्त केला.

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या एका वक्तव्याने चीनला चांगलीच मिरची झोंबली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत चीनसोबतच्या सीमावादावर बोलताना जयशंकर म्हणाले होते की, 'चीनशी चांगले द्विपक्षीय संबंध ठेवण्यासाठी सीमेवर शांतता राहणे गरजेचे आहे. ज्या मुद्द्यावरुन चीनसोबतचा वाद अद्याप संपलेला नाही, ते मुख्यत्वे गस्तीचे अधिकाराशी संबंधित आहेत.' यावर आता चिनी संरक्षण तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे वक्तव्य चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

'चीनला हे कळायला हवं...'मुलाखतीदरम्यान जयशंकर म्हणाले होते की, 'आज आपले चीनसोबतचे संबंध सामान्य नाहीत. याचे कारण म्हणजे सीमेवरील शांतता भंग पावली आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती आपल्या हिताची नाही, हे चीनला कळायला हवं.' या मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूजवीक मासिकाला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला होता, ज्यामध्ये पंतप्रधानांनी सीमा विवादावरील तोडगा केवळ भारत-चीन संबंधांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते.

चिनी तज्ज्ञांची भारताविरोधात भूमिकापरराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यावर शांघाय अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे रिसर्च फेलो हू झिओंग यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना म्हटले की, जयशंकर यांच्या टिप्पण्यांबाबत चीनने अधिक सावध राहायला हवं. जयशंकर यांनी 'राइट टू पेट्रोल'वर केलेली टिप्पणी म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. आता चीनने केवळ भारताची सामान्य चर्चाच करू नये, तर लष्करी संघर्षासाठीही तयार राहावे. जयशंकर यांनी चीनला चिथावणी देऊन सीमा आणि गस्तीच्या अधिकारांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय