शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

'हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन...' जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला झोंबली मिरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 14:44 IST

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सीमावादाबाबत केलेल्या एका वक्तव्याने चीनी संरक्षण तज्ञाने संताप व्यक्त केला.

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या एका वक्तव्याने चीनला चांगलीच मिरची झोंबली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत चीनसोबतच्या सीमावादावर बोलताना जयशंकर म्हणाले होते की, 'चीनशी चांगले द्विपक्षीय संबंध ठेवण्यासाठी सीमेवर शांतता राहणे गरजेचे आहे. ज्या मुद्द्यावरुन चीनसोबतचा वाद अद्याप संपलेला नाही, ते मुख्यत्वे गस्तीचे अधिकाराशी संबंधित आहेत.' यावर आता चिनी संरक्षण तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे वक्तव्य चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

'चीनला हे कळायला हवं...'मुलाखतीदरम्यान जयशंकर म्हणाले होते की, 'आज आपले चीनसोबतचे संबंध सामान्य नाहीत. याचे कारण म्हणजे सीमेवरील शांतता भंग पावली आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती आपल्या हिताची नाही, हे चीनला कळायला हवं.' या मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूजवीक मासिकाला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला होता, ज्यामध्ये पंतप्रधानांनी सीमा विवादावरील तोडगा केवळ भारत-चीन संबंधांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते.

चिनी तज्ज्ञांची भारताविरोधात भूमिकापरराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यावर शांघाय अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे रिसर्च फेलो हू झिओंग यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना म्हटले की, जयशंकर यांच्या टिप्पण्यांबाबत चीनने अधिक सावध राहायला हवं. जयशंकर यांनी 'राइट टू पेट्रोल'वर केलेली टिप्पणी म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. आता चीनने केवळ भारताची सामान्य चर्चाच करू नये, तर लष्करी संघर्षासाठीही तयार राहावे. जयशंकर यांनी चीनला चिथावणी देऊन सीमा आणि गस्तीच्या अधिकारांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय