शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

India China FaceOff: भारत-चीन मतभेद शांततेने मिटवतील - नेपाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 02:57 IST

India China FaceOff: एलएसीवरील वाद मिटवताना या भागाचे स्थैर्य व देशाची शांतता याबाबत सजग राहतील, अशी अपेक्षाही नेपाळने व्यक्त केली आहे.

काठमांडू : भारत आणि चीन हे आपले मित्रदेश त्यांच्यातील मतभेद शांततेच्या मार्गाने मिटवतील, असा विश्वास नेपाळने व्यक्त केला आहे. हे दोन्ही देश एलएसीवरील वाद मिटवताना या भागाचे स्थैर्य व देशाची शांतता याबाबत सजग राहतील, अशी अपेक्षाही नेपाळने व्यक्त केली आहे.आशिया खंडातील दोन बलाढ्य राष्टÑांच्या वादात अडकलेल्या नेपाळने आपण शांततेच्या बाजूने आहोत, असेही म्हटले आहे. भारत व चीन आपले शेजारी देश आहेत. ते त्यांच्यातील मतभेद शांततेच्या मार्गाने सोडवतील, असे नेपाळच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताचे तीन भाग आपल्या देशाच्या नकाशात दाखविण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नेपाळचे हे वक्तव्य आले आहे. भारताचे लिपुलेख, कालापानी व लिम्पीयाधुरा हे भाग त्या देशाने त्यांच्या नकाशात दाखवले आहेत. नव्या नकाशाला संसदेत मान्यता देऊन त्याला अध्यक्षांनीही मंजुरी दिली आहे. नेपाळचे हे कृत्य चीनच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे, असाही आरोप केला जात आहे. नेपाळचा नवा नकाशा भारताने साफ धुडकावून लावला आहे.

टॅग्स :chinaचीन