शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

India China Faceoff: ...म्हणून चीनच्या मृत सैनिकांचे कुटुंबीय शी जिनपिंगवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:03 IST

आता सांत्वन करून या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न चीन सरकारने चालविला आहे.

बीजिंग : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चीनचे जे ४०पेक्षा अधिक सैनिक ठार झाले, त्यांच्या पार्थिवाचा उचित आदर न राखल्याने आणि त्यांच्या मृत्यूची वेळेत माहिती न दिल्याने सैनिकांचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. आता सांत्वन करून या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न चीन सरकारने चालविला आहे.चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हु शिजिन यांनी सांगितले की, वीरमरण आलेल्या सैनिकांविषयी लष्करासहित सर्वांच्याच मनात अतिशय आदर आहे. त्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली आहे. त्याची माहिती योग्य वेळी चिनी जनतेला दिली जाईल. असे सांगून या वृत्तपत्राने चीन सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. गलवान खोºयातील संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र चीनने त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जे सैनिक ठार झाले, त्यांचा उचित आदर राखला नाही, त्यांची नावेही जाहीर केली नाहीत असा आरोप या सैनिकांच्या नातेवाईकांनी केला होता. त्याची व्हिडीओफितही समाजमाध्यमांवर झळकली होती. त्यानंतर दोन दिवसांनी याच विषयावर ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने संपादकीय लिहिले आहे.भारतीय जवानांबरोबर गलवान खोºयात झालेल्या संघर्षात चीनचे २० पेक्षा कमी सैनिक ठार झाले आहेत असा उल्लेख या संपादकीयात करण्यात आला आहे. मात्र मृतांचा नेमका आकडा किती याविषयी चीनच्या सरकारने मौन बाळगले आहे. >मृतांचा आकडा गुलदस्त्यातचग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हु शिजिन यांनी संपादकीयात म्हटले आहे की, दोन्ही देशांतील जनमत बिथरू नये यासाठी चीनने गलवान संघर्षातील मृत सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही. या संघर्षात भारतीय जवानांनी चीनच्या ४०पेक्षा जास्त सैनिकांना ठार केले आहेत तसेच भारताने १६ सैनिकांचे मृतदेह चीनच्या हवाली केले अशा बातम्या पसरल्या होत्या. पण या निव्वळ अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही या संपादकीयात करण्यात आले आहे.

टॅग्स :chinaचीन