शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

India China Faceoff: ...म्हणून चीनच्या मृत सैनिकांचे कुटुंबीय शी जिनपिंगवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:03 IST

आता सांत्वन करून या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न चीन सरकारने चालविला आहे.

बीजिंग : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चीनचे जे ४०पेक्षा अधिक सैनिक ठार झाले, त्यांच्या पार्थिवाचा उचित आदर न राखल्याने आणि त्यांच्या मृत्यूची वेळेत माहिती न दिल्याने सैनिकांचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. आता सांत्वन करून या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न चीन सरकारने चालविला आहे.चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हु शिजिन यांनी सांगितले की, वीरमरण आलेल्या सैनिकांविषयी लष्करासहित सर्वांच्याच मनात अतिशय आदर आहे. त्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली आहे. त्याची माहिती योग्य वेळी चिनी जनतेला दिली जाईल. असे सांगून या वृत्तपत्राने चीन सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. गलवान खोºयातील संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र चीनने त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जे सैनिक ठार झाले, त्यांचा उचित आदर राखला नाही, त्यांची नावेही जाहीर केली नाहीत असा आरोप या सैनिकांच्या नातेवाईकांनी केला होता. त्याची व्हिडीओफितही समाजमाध्यमांवर झळकली होती. त्यानंतर दोन दिवसांनी याच विषयावर ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने संपादकीय लिहिले आहे.भारतीय जवानांबरोबर गलवान खोºयात झालेल्या संघर्षात चीनचे २० पेक्षा कमी सैनिक ठार झाले आहेत असा उल्लेख या संपादकीयात करण्यात आला आहे. मात्र मृतांचा नेमका आकडा किती याविषयी चीनच्या सरकारने मौन बाळगले आहे. >मृतांचा आकडा गुलदस्त्यातचग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हु शिजिन यांनी संपादकीयात म्हटले आहे की, दोन्ही देशांतील जनमत बिथरू नये यासाठी चीनने गलवान संघर्षातील मृत सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही. या संघर्षात भारतीय जवानांनी चीनच्या ४०पेक्षा जास्त सैनिकांना ठार केले आहेत तसेच भारताने १६ सैनिकांचे मृतदेह चीनच्या हवाली केले अशा बातम्या पसरल्या होत्या. पण या निव्वळ अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही या संपादकीयात करण्यात आले आहे.

टॅग्स :chinaचीन