शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चीननं काढली २० हजार भारतीय विद्यार्थ्यांविरोधात खुन्नस, भारतानं दिलं जशास तसं उत्तर!; कठोर निर्णय घेत केलं चीतपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 13:32 IST

Tit For Tat to China : भारताने चीनला आणखी एका आघाडीवर धडा शिकवला आहे. कोविडमुळे मायदेशी परतलेले २० हजार भारतीय विद्यार्थी पुन्हा चीनला अभ्यासासाठी जाण्याची वाट पाहत आहेत, मात्र चीन परवानगी देत ​​नाहीये. आता भारतानेही चिनी नागरिकांचे टुरिस्ट व्हिसा रद्द केले आहेत.

नवी दिल्ली-

चिनी नागरिक आता टुरिस्ट व्हिसावर भारतात येऊ शकणार नाहीत. जगभरातील एअरलाइन ऑपरेशन्सवर देखरेख ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (IATA) दिलेल्या माहितीनुसार चीनी नागरिकांना जारी करण्यात आलेले भारतीय पर्यटक व्हिसा यापुढे वैध राहणार नाहीत. चिनी पर्यटकांना भारतात येण्यापासून रोखण्याच्या निर्णयाला भारताच्या बाजूने चीनला चोख प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जात आहे. कोविड-19 महामारीमुळे भारतात परतलेल्या २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये दाखल होण्यास टाळाटाळ केली जात आहे. उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही चिनी लोकांना व्यवसाय, रोजगार, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा जारी करत आहे.

चीनमध्ये कोविड-19 महामारीच्या नव्या लाटेशी झुंज देत आहे. तरीही, थायलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना येण्याची परवानगी दिली आहे, परंतु भारतातील हजारो विद्यार्थी अद्याप बीजिंगच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या चिनी समकक्ष वांग यी यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, चीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने गेल्या महिन्यात १५६ देशांसाठी इलेक्ट्रॉनिक टूरिस्ट व्हिसाची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. कोविडमुळे दोन वर्षांनंतर भारताने २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली आहेत.

चीनबरोबरच ब्रिटन-कॅनडानेही बंदी घातलीभारताने ब्रिटन आणि कॅनडातील नागरिकांना ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात येण्यापासून रोखले आहे. पण त्या देशांतील भारतीय मिशनने जारी केलेल्या नियमित कागदी व्हिसावर ते भारतात येऊ शकतात. ताज्या निर्णयानुसार, जपान आणि अमेरिका व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नागरिकांना दिलेला भारताचा पर्यटन व्हिसा यापुढे वैध राहणार नाही. भारतातील पर्यटक व्हिसाची वैधता १० वर्षांपर्यंत असते. जागतिक संस्था IATA वेळोवेळी अपडेट करत असते जेणेकरुन एअरलाइन्सना कळू शकेल की कोणत्या देशाच्या नागरिकांना कोणत्या देशात प्रवास करण्याची परवानगी आहे. १९ एप्रिल रोजी भारताविषयी नवे अपडेट जारी केले होते, ज्यामध्ये कोणत्या देशांचे नागरिक यापुढे ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात जाऊ शकणार नाहीत याची माहिती देण्यात आली. 

भारताविषयीचा अहंकार चीन सोडेनाचीनसमोर भारत नतमस्तक होईल हा भ्रम चीन अजूनही सोडण्यास तयार नाही. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गडबड निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी फसलेला असतानाही चीन अजूनही भारताची भूमिका समजून घेऊ शकत नाही किंवा समजून घेऊ इच्छित नाही असंच दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिकेसह सर्व बलाढ्य पाश्चिमात्य देशांसमोर भारतानं रोखठोक भूमिका मांडली. किमान हे पाहून तरी चीननं काही तरी शिकायला हवं. तरीही चीन म्हणतं की तुमच्या बुद्धीला कुलूप लावलं गेलं असेल तर तुम्हाला स्वतःच्या ताकदीचा अभिमान वाटत राहील, समोरच्या व्यक्तीची ताकद कधीच दिसणार नाही. पण चीनच्या बाबतीतही तेच लागू होतं.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत