शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

चीननं काढली २० हजार भारतीय विद्यार्थ्यांविरोधात खुन्नस, भारतानं दिलं जशास तसं उत्तर!; कठोर निर्णय घेत केलं चीतपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 13:32 IST

Tit For Tat to China : भारताने चीनला आणखी एका आघाडीवर धडा शिकवला आहे. कोविडमुळे मायदेशी परतलेले २० हजार भारतीय विद्यार्थी पुन्हा चीनला अभ्यासासाठी जाण्याची वाट पाहत आहेत, मात्र चीन परवानगी देत ​​नाहीये. आता भारतानेही चिनी नागरिकांचे टुरिस्ट व्हिसा रद्द केले आहेत.

नवी दिल्ली-

चिनी नागरिक आता टुरिस्ट व्हिसावर भारतात येऊ शकणार नाहीत. जगभरातील एअरलाइन ऑपरेशन्सवर देखरेख ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (IATA) दिलेल्या माहितीनुसार चीनी नागरिकांना जारी करण्यात आलेले भारतीय पर्यटक व्हिसा यापुढे वैध राहणार नाहीत. चिनी पर्यटकांना भारतात येण्यापासून रोखण्याच्या निर्णयाला भारताच्या बाजूने चीनला चोख प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जात आहे. कोविड-19 महामारीमुळे भारतात परतलेल्या २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये दाखल होण्यास टाळाटाळ केली जात आहे. उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही चिनी लोकांना व्यवसाय, रोजगार, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा जारी करत आहे.

चीनमध्ये कोविड-19 महामारीच्या नव्या लाटेशी झुंज देत आहे. तरीही, थायलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना येण्याची परवानगी दिली आहे, परंतु भारतातील हजारो विद्यार्थी अद्याप बीजिंगच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या चिनी समकक्ष वांग यी यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, चीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने गेल्या महिन्यात १५६ देशांसाठी इलेक्ट्रॉनिक टूरिस्ट व्हिसाची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. कोविडमुळे दोन वर्षांनंतर भारताने २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली आहेत.

चीनबरोबरच ब्रिटन-कॅनडानेही बंदी घातलीभारताने ब्रिटन आणि कॅनडातील नागरिकांना ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात येण्यापासून रोखले आहे. पण त्या देशांतील भारतीय मिशनने जारी केलेल्या नियमित कागदी व्हिसावर ते भारतात येऊ शकतात. ताज्या निर्णयानुसार, जपान आणि अमेरिका व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नागरिकांना दिलेला भारताचा पर्यटन व्हिसा यापुढे वैध राहणार नाही. भारतातील पर्यटक व्हिसाची वैधता १० वर्षांपर्यंत असते. जागतिक संस्था IATA वेळोवेळी अपडेट करत असते जेणेकरुन एअरलाइन्सना कळू शकेल की कोणत्या देशाच्या नागरिकांना कोणत्या देशात प्रवास करण्याची परवानगी आहे. १९ एप्रिल रोजी भारताविषयी नवे अपडेट जारी केले होते, ज्यामध्ये कोणत्या देशांचे नागरिक यापुढे ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात जाऊ शकणार नाहीत याची माहिती देण्यात आली. 

भारताविषयीचा अहंकार चीन सोडेनाचीनसमोर भारत नतमस्तक होईल हा भ्रम चीन अजूनही सोडण्यास तयार नाही. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गडबड निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी फसलेला असतानाही चीन अजूनही भारताची भूमिका समजून घेऊ शकत नाही किंवा समजून घेऊ इच्छित नाही असंच दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिकेसह सर्व बलाढ्य पाश्चिमात्य देशांसमोर भारतानं रोखठोक भूमिका मांडली. किमान हे पाहून तरी चीननं काही तरी शिकायला हवं. तरीही चीन म्हणतं की तुमच्या बुद्धीला कुलूप लावलं गेलं असेल तर तुम्हाला स्वतःच्या ताकदीचा अभिमान वाटत राहील, समोरच्या व्यक्तीची ताकद कधीच दिसणार नाही. पण चीनच्या बाबतीतही तेच लागू होतं.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत